शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्‘ातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वरील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रत्येक गावात कृषी विभागाय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेऊन या बैठका घ्याव्यात, यापूर्वीच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली.
या आढावा बैठकीला आ. सुनील केदार, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.
हवामान-वातावरण बदलानुसार पीक पध्दतीत बदल, उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. एका बैठकीत किमान २५० शेतकरी असले पाहिजेत. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून या चमूला द्यावा व सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
फळबागा आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही याकडे आमदार सुनील केदार यांनी लक्ष वेधले. यावर कृषी विभागाजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय शेतकरी किती, अनुसूचित जमातीचे शेतकरी किती, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशी यादी बनवावी. पीक पध्दतीनुसार पिकाचे नियोजन करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाचे कनेक्शन जूनपयंर्त पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.