शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्‘ातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वरील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रत्येक गावात कृषी विभागाय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेऊन या बैठका घ्याव्यात, यापूर्वीच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली.
या आढावा बैठकीला आ. सुनील केदार, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.
हवामान-वातावरण बदलानुसार पीक पध्दतीत बदल, उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. एका बैठकीत किमान २५० शेतकरी असले पाहिजेत. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून या चमूला द्यावा व सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
फळबागा आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही याकडे आमदार सुनील केदार यांनी लक्ष वेधले. यावर कृषी विभागाजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय शेतकरी किती, अनुसूचित जमातीचे शेतकरी किती, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशी यादी बनवावी. पीक पध्दतीनुसार पिकाचे नियोजन करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाचे कनेक्शन जूनपयंर्त पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.