शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्‘ातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वरील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रत्येक गावात कृषी विभागाय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेऊन या बैठका घ्याव्यात, यापूर्वीच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली.
या आढावा बैठकीला आ. सुनील केदार, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.
हवामान-वातावरण बदलानुसार पीक पध्दतीत बदल, उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. एका बैठकीत किमान २५० शेतकरी असले पाहिजेत. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून या चमूला द्यावा व सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
फळबागा आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही याकडे आमदार सुनील केदार यांनी लक्ष वेधले. यावर कृषी विभागाजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय शेतकरी किती, अनुसूचित जमातीचे शेतकरी किती, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशी यादी बनवावी. पीक पध्दतीनुसार पिकाचे नियोजन करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाचे कनेक्शन जूनपयंर्त पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.