शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पश्चिम नेपाळसह भारतातील 'या' शहरात भूकंप होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 20:10 IST

भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या वायव्येस ५०० किमी अंतरावर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात होता. 

नवी दिल्ली: भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठी हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, नेपाळमधील अनेक घरे जमीनदोस्त झाली. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला. पीडीएनएच्या अहवालानुसार, नेपाळ हा जगातील ११वा भूकंपग्रस्त देश आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा नेपाळच्या सुदूर पश्चिम पर्वतीय भागात ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा हा पहिला भूकंप नव्हता.

भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या वायव्येस ५०० किमी अंतरावर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात होता. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ भरत कोईराला यांनी सांगितले की, पृथ्वीच्या आत सक्रिय युरेशियन प्लेट्समध्ये बराच काळ टक्कर होत आहे, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा जमा झाली आहे. नेपाळ या २ प्लेट्सच्या सीमेवर वसलेले आहे आणि म्हणून ते अत्यंत सक्रिय भूकंपाच्या क्षेत्रात स्थित आहे, म्हणून नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत.

भूकंपशास्त्रज्ञ कोईराला यांनी सांगितले की, पश्चिम नेपाळला भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे. ते म्हणाले की, पश्चिम नेपाळमध्ये गेल्या ५२० वर्षांत एकही मोठा भूकंप झालेला नाही. त्यामुळे भरपूर ऊर्जा साठवली गेली आहे आणि ती ऊर्जा सोडण्याचा एकमेव मार्ग भूकंप आहे. कोईराला म्हणाले की, पश्चिम नेपाळमधील गोरखा (जिल्हा) ते भारताच्या डेहराडूनपर्यंत टेक्टोनिक हालचालींमुळे बरीच ऊर्जा जमा झाली आहे, त्यामुळे ही ऊर्जा सोडण्यासाठी या भागात छोटे-मोठे भूकंप होत आहेत, जे अत्यंत धोकादायक आहेत. 

प्लेट दर १०० वर्षांनी पुढे सरकते

भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात नवीन पर्वतश्रेणी हिमालय आहे. तिबेट आणि भारतीय महाद्वीपीय प्लेट्सच्या टक्कर झाल्यामुळे त्याच्या दक्षिणेकडील टोकाला, युरेशियन प्लेट शतकानुशतके टेक्टोनिकदृष्ट्या वाढत आहे आणि विकसित होत आहे. भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितले की या प्लेट्स दर १०० वर्षांनी २ मीटरने पुढे सरकत आहेत, परिणामी सक्रिय ऊर्जा अचानक पृथ्वीच्या आत सोडली जाते, ज्यामुळे पृथ्वीच्या वरच्या भागात हालचाल होते.

नेपाळमध्ये दररोज कमी तीव्रतेचे भूकंप-

भूकंप मॉनिटरिंग आणि रिसर्च सेंटरच्या डेटावरून असे दिसून येते की, १ जानेवारी २०२३ पासून नेपाळमध्ये ४.० आणि त्याहून अधिक तीव्रतेचे एकूण ७० भूकंप झाले आहेत. त्यापैकी १३ ची तीव्रता ५ ते ६ दरम्यान होती, तर तिघांची तीव्रता ६०० च्या वर होती. कोइराल म्हणाले की, टेक्टोनिक प्लेटच्या हालचालींद्वारे जमा झालेली ऊर्जा सोडण्यासाठी शतकानुशतके दररोज दोन किंवा अधिक तीव्रतेचे भूकंप होत आहेत.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारतNepalनेपाळ