शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

महावितरण, तलाठी कार्यालयांत हेलपाटे

By admin | Updated: November 15, 2015 21:13 IST

अवसरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवसरी : आंबेगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाकडून सर्वसामान्य जनतेची कामे हेलपाटे मारून देखील होत नसल्याने तालुक्यातील प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या वाढल्याने गावागावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ नवीन घरे बांधत आहेत. विहिरी व बोअरवेल घेतली आहे. घरांसाठी, विहिरींसाठी विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत पुरवठ्यासाठी सहा-सहा महिने अर्ज करूनही वीजजोड मिळत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे लोक अधिकार्‍यांना टेबलाखालून पैसे देऊन वीजजोड घेतात. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा ग्राहकांना सहा-सहा महिने हेलपाटे मारून देखील वीजजोड मिळत नाही. विद्युत वितरण कंपनीने नेमलेले ठेकेदार हे अधिकार्‍यांना जुमानत नसल्याने सर्वसामान्यांची कामे वेळेत होत नाहीत. जे ग्राहक जास्त पैसे देतील त्यांची कामे आठ दिवसांत होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यात महसूल विभागाची अशीच परिस्थिती असून हक्कसोड पत्र, वारसहक्क नोंद, जमीन खरेदी-विक्री यांची नोंद करण्यासाठी ४ ते ५ महिने तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून देखील तलाठी दखल घेत नाहीत. अर्जदाराने तलाठ्याला विचारले असता, मंडलाधिकारी सही करत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. मंचर, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव आदी गावांतील गावामध्ये एजंटशिवाय सर्वसामान्यांची कामे होत नाही. मात्र वरील गावातील राजकीय पुढार्‍यांची कामे बिनापैशात एकाच दिवसात होत आहेत. तहसील कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी अर्ज केले. मात्र तहसील कार्यालयात रेशनकार्ड उपलब्ध नसल्याने घोडेगाव तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
तालुक्यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असे नेते असताना देखील सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रशासकीय अधिकार्‍यांकडून होत नाही.