शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कचऱ्यावरून महाराष्ट्राची कानपिळी!

By admin | Updated: January 20, 2015 01:49 IST

राजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीराजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत. वर्षभरापासून कचऱ्याचा आराखडा देण्यास टाळाटाळ चालविल्याने आता, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याचा संपूर्ण अहवाल पंधरा दिवसांत द्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड आणि गुजरातलाही प्राधिकरणाने एकाच तराजूत मोजून तडाखा दिला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीत योजना सादर न केल्याने हे प्रगत राज्य असल्याने त्यानेही वर्षभरापासून या विषयाकडे डोळेझाक केल्याने प्राधिकरण चांगलेच संतापले आहे. देशातील कचऱ्याचे काय करायचे, यासाठी देशभरातील जेवढ्या याचिका सर्वौच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या, त्या एकत्रित करून सर्वौच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित प्राधिकारणाकडे पाठविल्या. प्राधिकरणाने वर्षभरापासून संबंधित राज्यांना कृतिबध्द आराखडा सादर करण्याचे सांगितले, यावर अनेकदा सुनावण्या झाल्या. मात्र विविध कारणांनी राज्ये आराखडा टाळतच गेले. गेल्या आठवड्यात न्या. स्वतंत्रकुमार यांनी राज्यांना तडक आदेश दिले असून, पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत राज्यांतील नगरविकास सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांना हजर राहण्याचे सांगण्यात आले. पण सुनावणीआधी आठ दिवस कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी राज्याचा आराखडा पाठवायचा आहे. आराखडा दिला नाही अथवा संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीततर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून ५० हजार रूपये दंड केला जाईल व तो बेजबाबदार अधिकाऱ्याकडून वसुल केला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनाची जागा, कालबध्द कार्ययोजना, योजनेचा संपूर्ण खर्च, शहरात केली जाणारी वृक्षलागवड व त्यासाठी येणारा खर्च तसेच कचऱ्यापासून वीज निर्मिती किती होणार या मुद्यांवर अहवाल सादर करायचा आहे.