शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

कचऱ्यावरून महाराष्ट्राची कानपिळी!

By admin | Updated: January 20, 2015 01:49 IST

राजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीराजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत. वर्षभरापासून कचऱ्याचा आराखडा देण्यास टाळाटाळ चालविल्याने आता, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याचा संपूर्ण अहवाल पंधरा दिवसांत द्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड आणि गुजरातलाही प्राधिकरणाने एकाच तराजूत मोजून तडाखा दिला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीत योजना सादर न केल्याने हे प्रगत राज्य असल्याने त्यानेही वर्षभरापासून या विषयाकडे डोळेझाक केल्याने प्राधिकरण चांगलेच संतापले आहे. देशातील कचऱ्याचे काय करायचे, यासाठी देशभरातील जेवढ्या याचिका सर्वौच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या, त्या एकत्रित करून सर्वौच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित प्राधिकारणाकडे पाठविल्या. प्राधिकरणाने वर्षभरापासून संबंधित राज्यांना कृतिबध्द आराखडा सादर करण्याचे सांगितले, यावर अनेकदा सुनावण्या झाल्या. मात्र विविध कारणांनी राज्ये आराखडा टाळतच गेले. गेल्या आठवड्यात न्या. स्वतंत्रकुमार यांनी राज्यांना तडक आदेश दिले असून, पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत राज्यांतील नगरविकास सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांना हजर राहण्याचे सांगण्यात आले. पण सुनावणीआधी आठ दिवस कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी राज्याचा आराखडा पाठवायचा आहे. आराखडा दिला नाही अथवा संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीततर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून ५० हजार रूपये दंड केला जाईल व तो बेजबाबदार अधिकाऱ्याकडून वसुल केला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनाची जागा, कालबध्द कार्ययोजना, योजनेचा संपूर्ण खर्च, शहरात केली जाणारी वृक्षलागवड व त्यासाठी येणारा खर्च तसेच कचऱ्यापासून वीज निर्मिती किती होणार या मुद्यांवर अहवाल सादर करायचा आहे.