शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळे मनसेची वाताहत

By admin | Updated: September 25, 2014 01:25 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यात पक्षाची घडी बसण्याऐवजी अंतर्गत गटबाजी आणि पदांच्या हव्यासापोटी ती विस्कटलेलीच आहे

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यात पक्षाची घडी बसण्याऐवजी अंतर्गत गटबाजी आणि पदांच्या हव्यासापोटी ती विस्कटलेलीच आहे. गटबाजीमुळे अनेक दिग्गजांनी यापूर्वीच पक्षाला रामराम ठोकला आहे. परंतु, असे असले तरी यातून बोध घेण्याऐवजी ठाण्यात मनसेची वाताहत होताना दिसत आहे. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर केवळ पदाच्या हव्यासापायी काही कार्यकर्त्यांनी पक्षातीलच इतर पदाधिकाऱ्यांशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही त्यांच्याविरोधात पक्षाने कोणतीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेतील पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा उघड झाल्याने त्याचे भोग येत्या काळात भोगावे लागण्याची चिन्हे आहेत. अगदी सुरुवातीच्या काळातही नवीन असूनही पक्षाकडे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी होती. त्यात तरुणवर्गाचे प्रमाण मोठे होते. परंतु, ठाण्यातील या मनसेला सुरुवातीच्या काळापासूनच गटबाजीचे ग्रहण लागले होते. २००७ साली मनसेत दाखल झालेले ज्येष्ठ नेते सतीश प्रधान हेही या गटबाजीपासून लांब राहिले नाहीत. शेवटी, या गटबाजीला कंटाळूनच त्यांनी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत तर पक्षातील गटबाजीपायीच ठाणे विधानसभा क्षेत्रात हातातोंडाशी आलेला मनसेचा विजय हिरवला होता.त्यानंतरही पक्षातील हे अंतर्गत राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक गटाची वेगळी आंदोलने, वेगळे कार्यक्र म यामुळे पक्षात एकसूत्रता येत नव्हती. त्यामुळे पक्षाची ताकद असतानाही केवळ गटबाजीमुळे मनसेला येथे यश कठीण झाले आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला मिळालेली सव्वा लाखाच्या वरची मते त्यांची ताकद दाखवणारी होती. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तर ठाणे महापालिकेच्या हद्दीतील चार विधानसभेच्या जागांपैकी ठाणे शहर आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघांत तर मनसेच्या उमेदवाराने काँग्रेसला पिछाडीवर टाकून दुसऱ्या क्र मांकाची मते घेतली होती. यावरून पक्षाच्या ताकदीचा अंदाज येत होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर राजन राजे यांनीही पक्षाशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली. एकीकडे नवे मतदार पक्षाकडे आकर्षित होत असताना दुसरीकडे पक्षातील स्थानिक नेत्यांचे आपसातील कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तिकीटवाटपावरून जो वाद आणि स्थानिक नेत्यांचे जे राजकारण झाले, त्याचा फटका पुन्हा एकदा पक्षाला बसला आणि संधी असूनही त्यांचे केवळ सात नगरसेवक निवडून आले. यानंतर पक्षात अनेक बदल झाले़ निलेश चव्हाण यांच्याकडे शहर अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली. तर मुंबई मनपामधील नगरसेवक गिरीश धानुरकर यांच्याकडे संपर्क अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी केली जात असतानाच पक्षातीलच काही विघ्नसंतोषी पदाधिकारी केवळ स्वत:चा फायदा कसा होईल, या दृष्टीने पक्षातच अंतर्गत कुरघोडीचे राजकारण करून आपले पद कसे शाबूत राहील, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात मनसेची वाताहत सुरू आहे. (प्रतिनिधी)