शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कमी दाबाने पाणी पुरवठा

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

प्रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.

प्रभागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे. घंटागाडी नियमित येते. रस्त्यांवरील दिवे चालू असून, काही वेळा बंद असतात. औषध फवारणी होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत आहे, परंतु कधी कधी कमी दाबाने पाणी येते.
- दिस्ती जोशी, जुने सिडको.
रस्त्यावरील भाजीबाजार हटवा
प्रभागातील पाणीप्रश्न व इतर समस्या या भेडसावत नसल्यातरी जुने सिडको येथे रस्त्यावर भरणारा भाजीबाजार हटविणे गरजेचे आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच वाहतुकीची समस्या सुटेल.
- सुरज अहिरे, शांतीनगर
गुन्हेगारी थांबवा
प्रभागातील पाणीप्रश्न सुरळीत आहे. रस्त्यांवरील दिवेदेखील रात्रीच्या वेळी सुरू असतात. परंतु प्रभागात चोरी होण्याचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलिसांनी नियोजन करावे.
- तानाजी सांगळे, लेखानगर
पोलीस गस्त वाढवावी
प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणे मुश्कील झाले असून, यासाठी पोलिसांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे.
- जयश्री लोखंडे, जुने सिडको.
धूर फवारणी करावी
प्रभागात औषध व धूर फवारणी केली जात नाही. सिडको भागात स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढली असून, मनपाने स्वच्छता व धूर फवारणी नियमित करावी. पथदीप चालू-बंद असतात. हद्दीच्या वादामुळे विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात.
-पंडित सोनवणे, महाराणाप्रताप चौक.

डासांचे प्रमाण वाढले
प्रभागात घंटागाडी नियमित येत असली तरी धूर व औषध फवारणी होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते चांगले असून, सुंदरबन कॉलनी उद्यानात खेळणी बसविण्याची गरज आहे.
- महेंद्र विभांडिक, सुंदरबन कॉलनी

(पान ५ वरील उर्वरित मजकूर)
उद्यानाची दुरवस्था
प्रभागातील सुंदरबन कॉलनी येथे नगरसेवकांनी मनपाच्या माध्यमातून अद्यावत उद्यान उभारले होते. या उद्यानात दररोज सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत असे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे टवाळखोरीचा उपद्रव वाढलेला आहे. याठिकाणी असलेल्या खेळण्या गायब झाल्या असून, उद्यानातील लॉन खराब झाले आहे. उद्यानातील दिवे बंद झालेले असून, संपूर्ण उद्यानाची दुरवस्था झाली आहे. प्रभागात उद्यानांची संख्या कमी असतानाही आहे त्या उद्यानाची देखभाल मनपाकडून करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.