शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कानळदा ग्रा.पं.ला ठोकले कुलूप ग्रामसेवक येईना : कार्यालय दिवसा बंद रात्री सुरू

By admin | Updated: July 16, 2016 22:38 IST

कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले.

कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकले.
ग्रामसेवकाकडे दोन, तीन गावांचा प्रभार आहे. त्यामुळे ते येत नसल्याची माहिती दिली जाते. ग्रामस्थांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
१५ तारखेला ग्रामपंचायतीचे कार्यालय रात्री उघडण्यात आले होते. दिवसा कार्यालय बंद असते, ग्रामसेवक नसतो, मग रात्री कार्यालय सुरू का केले, असा मुद्दाही अनेक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तलाठीही प्रभारी
कानळदा गावाची लोकसंख्या २५ हजार एवढी आहे. तर आजूबाजूला फुपनगरी, वडनगरी, कुवारखेडा ही गावे आहेत. असे असताना गावात प्रभारी तलाठी आहे. तलाठ्याकडे ऑनलाईन कामकाज होत नाही. त्यामुळे सातबार्‍यावरील नोंदी घेणे, नोंदी दाखले पाहून नष्ट करणे ही कामे होत नाहीत. उतारे कोरे आणा आणि कर्ज घ्या,बोजे हटवा, असे सहकारी व राष्ट्रीयकृत बँका म्हणतात. परंतु तलाठीच नसल्याने सातबारा उतार्‍यांवरील बोजे कसे दूर होणार, असा प्रश्न आहे. मागील १५ दिवसांपासून तलाठीही गावात आलेला नाही. किमान दोन दिवस तलाठी गावाय यायला हवा.

अनुदान रखडले
मागील खरीप हंगामाचे अनुदानही मिळालेले नाही. तलाठीच नसल्याने याबाबत कार्यवाही होत नाही. सातबारा, पीक नोंदी असे दाखले मिळत नाहीत. त्यातच पंचक्रोशीतील फुपनगरी, वडनगरी, कानळदा येथील शेतकर्‍यांचे खरिपाचे अनुदानही रखडल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत ग्रामस्थ लेखी तक्रार करणार आहेत. (वार्ताहर)