शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

लोकसभेत महाराष्ट्राकडे लक्ष वेधले

By admin | Updated: December 18, 2014 05:01 IST

रंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला

नवी दिल्ली : औरंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला मिळावा, कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती, मुंबई - बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाऐवजी सांकरी महामार्ग करावा या व अन्य मागण्यांनी लोकसभेतील शून्यप्रहरावर संपूर्ण महाराष्ट्राची छाया होती. मार्ग हे जीवनरेषा असतात, पण काही रस्ते मृत्यूचे सापळे ठरत आहेत, तेव्हा याकडे लक्ष द्या, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन खर्च आणि मिळणारा मोबदला याचा ताळमेळ सांधा, अशा सूचनाही सरकारला धडाक्यात केल्याने आजच्या शून्यप्रहराने राज्याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यात आले.कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालयकोल्हापूरमध्ये २०११ पर्यंत पासपोर्ट कार्यालय होते. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये खाजगीकरणात टीसीएस कंपनीकडे ते चालवायला दिले. तेव्हापासून ते आजतागायत बंद आहे. २५० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यातून संपूर्ण कारभार चालतो, असे सांगून खा. धनंजय महाडिक म्हणाले, एका पासपोर्टसाठी एका कुटुंबाची अपॉइंटमेंट वेगवेगळ््या दिवशी ठरते. पैसा, वेळ खर्च होतो. त्यामुळे कोल्हापुरातील कार्यालय पुन्हा सुरू करावे.हिंगोलीतील महामार्गाची दुर्दशादेशातील सर्वात वाईट महामार्ग आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा- वारंगा महामार्ग आहे, असे सांगून खा. राजीव सातव म्हणाले, या महामार्गाच्या दुरुस्तीबद्दल यापूर्वी दोनवेळा आपण सदनात बोललो आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी केंद्रातील महासंचालकांनी याबाबत कळवून ७० कोटी रूपयांत दुरूस्ती होऊ शकते, असे म्हटले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही झाल्या, पण हा महामार्ग दुरूस्त केला जात नाही. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा अधिक अपघात या मार्गावर झाले आहेत. सांकरी मार्ग करामुंबई- अहमदाबाद महामार्गावर आठ पदरी सांकरी महामार्गाचे काम सुरू आहे, त्याला जोडून पुन्हा मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गाची गरज नाही असे खा. चिंतामण वानगा यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)