शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

कर्जबुडव्या कंपन्यांची यादी द्या : सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: February 17, 2016 03:37 IST

बँकांच्या बुडीत कर्जांचे उत्तरोत्तर वाढत असलेले प्रमाण आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ढासळत चाललेली वित्तीय स्थिती याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली : बँकांच्या बुडीत कर्जांचे उत्तरोत्तर वाढत असलेले प्रमाण आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ढासळत चाललेली वित्तीय स्थिती याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली व ज्यांच्याकडे ५०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कर्जे थकली आहेत अशा कंपन्यांची यादी रिझर्व्ह बँकेने सादर करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.एवढेच नव्हे, तर ‘कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग स्कीम’नुसार ज्यांच्या कर्जांची फेररचना करण्यात आली आहे, अशा बड्या कर्जदारांचीही यादी न्यायालयाने मागितली आहे. या दोन्ही प्रकारच्या याद्या रिझर्व्ह बँकेने येत्या सहा आठवड्यांत सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करायच्या आहेत.केंद्र सरकारच्या ‘हाउसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (हुडको) काही कंपन्यांना दिलेल्या संशयास्पद कर्जांसंबंधी ‘दि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेने २००५मध्ये केलेली एक जनहित याचिका प्रलंबित आहे. सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. उदय लळित आणि न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने हा विषय गंभीर असल्याचे नमूद करून वरीलप्रमाणे आदेश देत प्रलंबित याचिकेत रिझर्व्ह बँकेसही प्रतिवादी केले. वर्ष २०१३ ते २०१५ या काळात २९ सरकारी बँकांनी एकूण १.१४ लाख कोटींची थकीत कर्जे त्यांच्या खातेपुस्तकांतून काढून टाकल्याची रिझर्व्ह बँकेकडूनच ‘आरटीआय’खाली मिळालेली माहिती एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाने अलीकडेच प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने असे प्रश्न उपस्थित केले की, सरकारी बँका आणि वित्तीय संस्था सुयोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता मोठ्या रकमांची कर्जे कशी काय देतात? अशी कर्जे थकल्यावर ती वसूल करण्याची काही पुरेशी तरतूद आहे की नाही? एकट्या २०१५ या वर्षात कंपन्यांना दिलेली ४० हजार कोटी रुपयांची कर्जे वसूल होत नाहीत म्हणून बँकांनी खातेपुस्तकांतून काढून टाकली आहेत, असे याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले.मोठ्या रकमांची कर्जे वर्षानुवर्षे थकीत राहूनही ती वसूल करण्यासाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत, याविषयी आश्चर्य व्यक्त करत न्यायालय असेही म्हणाले की, बड्या कर्जबुडव्यांच्या यादीवर नजर टाकली तर या मंडळींनी भली मोठी साम्राज्ये उभारली आहेत, पण तरी ते कर्जाची परतफेड करीत नाहीत, असे दिसते!