शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

कमी पावसामुळे लांबल्या पेरण्या!

By admin | Updated: July 2, 2016 04:43 IST

संपूर्ण जून महिन्यात सामान्य पर्जन्यमानापेक्षा देशात सरासरी १८ टक्के कमी पाऊस पडला

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- संपूर्ण जून महिन्यात सामान्य पर्जन्यमानापेक्षा देशात सरासरी १८ टक्के कमी पाऊस पडला असून, अनियमित मान्सूनमुळे शेतीचे नियोजित वेळापत्रक कोलमडत असून, देशात २४ टक्के पेरण्या मागे पडल्या आहेत. काही राज्यांत तर पेरण्या खोळंबण्याचे प्रमाण ६0 ते ७0 टक्के आहे. त्यात मुख्यत्वे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या शेतीत अग्रेसर असलेल्या राज्यांचा समावेश आहे. या दोन्ही राज्यांत भात (धान), डाळी आणि कडधान्ये, कापूस, सोयाबीनच्या पेरण्या मागे पडल्या आहेत. अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम होणार असून, ते २० टक्क्यांनी घसरेल अशी भीती वर्तविली जात आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या मध्य क्षेत्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. शेतीयोग्य ४४ टक्के क्षेत्राचा त्यात समावेश असून, हे क्षेत्र मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आदी राज्यांतले आहे. दक्षिणेकडील राज्यांच्या तटवर्ती भागात तूर्त १५ ते २0 टक्के पर्जन्यमान आहे. पूर्व भारतात सामान्य पर्जन्यमान २५ टक्के असून, ईशान्येकडील राज्यात सरासरीपेक्षा ३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. >...तर उत्पादनच घसरेल!कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार मान्सूनचे वेळापत्रक पुढल्या आठवड्यापर्यंत दुरूस्त झाले नाही, तर पेरण्या आणखी लांबतील. यामुळे पेरण्या झालेले आणि न झालेले क्षेत्र अशा दोघांचेही उत्पादन घसरेल. काही पिके अशी आहेत की ज्यांच्या पेरण्या जुलैच्या मध्यापर्यंतही चालू शकतात. त्यांची आशा अद्याप शिल्लक असली तरी उशिरा बरसलेल्या मान्सूनचा सर्वाधिक फटका डाळी व कडधान्याच्या पिकांना सोसावा लागणार आहे. ही पिके तयार होण्यास साधारणत: ६ महिन्यांचा काळ लागतो. उशिराच्या मान्सूनमुळे पिके तयार होण्यास यापेक्षा कमी काळ मिळाला तर उत्पादनाच्या गुणवत्तेवर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम संभवतो. परिणामी, उत्पादन २0 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.>अद्याप प्रारंभच नाहीकृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, यंदा अनियमित मान्सूनमुळे देशाच्या बहुतांश भागात कडधान्यांच्या पेरण्यांचा अद्याप प्रारंभच होऊ शकलेला नाही. गतवर्षी याच काळात २७ लाख हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी झाली होती. यंदा जून अखेर हा आकडा ६.५ लाख हेक्टरपर्यंत घसरला आहे. सोयाबीनचे उदाहरण द्यायचे तर गतवर्षी जून अखेर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा अवघ्या २ लाख हेक्टरच्या आसपास आहे.