शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

कमी पावसामुळे लांबल्या पेरण्या!

By admin | Updated: July 2, 2016 04:43 IST

संपूर्ण जून महिन्यात सामान्य पर्जन्यमानापेक्षा देशात सरासरी १८ टक्के कमी पाऊस पडला

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- संपूर्ण जून महिन्यात सामान्य पर्जन्यमानापेक्षा देशात सरासरी १८ टक्के कमी पाऊस पडला असून, अनियमित मान्सूनमुळे शेतीचे नियोजित वेळापत्रक कोलमडत असून, देशात २४ टक्के पेरण्या मागे पडल्या आहेत. काही राज्यांत तर पेरण्या खोळंबण्याचे प्रमाण ६0 ते ७0 टक्के आहे. त्यात मुख्यत्वे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या शेतीत अग्रेसर असलेल्या राज्यांचा समावेश आहे. या दोन्ही राज्यांत भात (धान), डाळी आणि कडधान्ये, कापूस, सोयाबीनच्या पेरण्या मागे पडल्या आहेत. अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम होणार असून, ते २० टक्क्यांनी घसरेल अशी भीती वर्तविली जात आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या मध्य क्षेत्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. शेतीयोग्य ४४ टक्के क्षेत्राचा त्यात समावेश असून, हे क्षेत्र मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आदी राज्यांतले आहे. दक्षिणेकडील राज्यांच्या तटवर्ती भागात तूर्त १५ ते २0 टक्के पर्जन्यमान आहे. पूर्व भारतात सामान्य पर्जन्यमान २५ टक्के असून, ईशान्येकडील राज्यात सरासरीपेक्षा ३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. >...तर उत्पादनच घसरेल!कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार मान्सूनचे वेळापत्रक पुढल्या आठवड्यापर्यंत दुरूस्त झाले नाही, तर पेरण्या आणखी लांबतील. यामुळे पेरण्या झालेले आणि न झालेले क्षेत्र अशा दोघांचेही उत्पादन घसरेल. काही पिके अशी आहेत की ज्यांच्या पेरण्या जुलैच्या मध्यापर्यंतही चालू शकतात. त्यांची आशा अद्याप शिल्लक असली तरी उशिरा बरसलेल्या मान्सूनचा सर्वाधिक फटका डाळी व कडधान्याच्या पिकांना सोसावा लागणार आहे. ही पिके तयार होण्यास साधारणत: ६ महिन्यांचा काळ लागतो. उशिराच्या मान्सूनमुळे पिके तयार होण्यास यापेक्षा कमी काळ मिळाला तर उत्पादनाच्या गुणवत्तेवर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम संभवतो. परिणामी, उत्पादन २0 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.>अद्याप प्रारंभच नाहीकृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, यंदा अनियमित मान्सूनमुळे देशाच्या बहुतांश भागात कडधान्यांच्या पेरण्यांचा अद्याप प्रारंभच होऊ शकलेला नाही. गतवर्षी याच काळात २७ लाख हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी झाली होती. यंदा जून अखेर हा आकडा ६.५ लाख हेक्टरपर्यंत घसरला आहे. सोयाबीनचे उदाहरण द्यायचे तर गतवर्षी जून अखेर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा अवघ्या २ लाख हेक्टरच्या आसपास आहे.