शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

संघाविरुद्धचे विधान, माफीऐवजी राहुल खटल्याला सामोरे जाणार

By admin | Updated: July 19, 2016 23:27 IST

गांधी हत्येबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागण्याऐवजी खटल्याला सामोरे जाण्याचा पवित्रा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : गांधी हत्येबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागण्याऐवजी खटल्याला सामोरे जाण्याचा पवित्रा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. संघाविरुद्धचे आपले विधान सिद्ध करण्यासाठी आपण पुरावे सादर करू, असे ते म्हणाले. राहुल यांनी गांधी हत्येबद्दल संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागावी; अन्यथा खटल्याला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर राहुल यांनी ही भूमिका जाहीर केली.

गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात झालेला पत्रव्यवहार राहुल न्यायालयात सादर करतील, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. संघाविरुद्ध केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील न्यायालयात गुन्हेगारी अब्रूनुकसानीचा खटला सुरू आहे. तो रद्द करण्याची मागणी राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोणाविरुद्ध जेव्हा बोलता तेव्हा सावधपणे बोलायला हवे, असे कडक शब्दांत सुनावले होते.

तसेच या विधानाबद्दल माफी मागावी किंवा खटल्याला सामोरे जावे, असे मतही नोंदविले होते. राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत गांधी यांच्या हत्येसाठी संघ जबाबदार असल्याचे विधान केले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होईल.

दरम्यान, संघाची भूमिका उघड व्हावी यासाठी काँग्रेस पुरावे गोळा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधींच्या हत्येनंतर नेहरू यांनी पटेल यांना पत्र लिहून संघावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या उत्तरादाखल पटेल यांनी लिहिलेले पत्र महत्त्वपूर्ण आहे.

कारण, या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, बापूंचा मारेकरी नथुराम गोडसे संघाच्या विचारसरणीने प्रेरित होता आणि महात्म्याच्या हत्येनंतर संघाने मिठाई वाटली होती. काँग्रेस राहुल यांचा बचाव करताना इतर कागदपत्रांसह हे पत्रही सादर करणार आहे.