शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

नव्या वर्षात संसद चालू देण्याचा संकल्प सोडा

By admin | Updated: January 1, 2016 02:11 IST

विविध मुद्यांवर गोंधळ आणि नारेबाजी करून संसदेचे कामकाज हाणून पाडणाऱ्या काँगे्रसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार कानपिचक्या दिल्या. तब्बल सहा दशके देशावर

नोएडा : विविध मुद्यांवर गोंधळ आणि नारेबाजी करून संसदेचे कामकाज हाणून पाडणाऱ्या काँगे्रसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार कानपिचक्या दिल्या. तब्बल सहा दशके देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात तरी काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरक्षित चालू देण्याचा संकल्प सोडून देशाच्या विकासात सहकार्य द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. अर्थात, ‘आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा’, असे आक्रमक प्रत्युत्तर काँग्रेसने तातडीने दिले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी दु्रतगती मार्गाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. काँगे्रसला लक्ष्य करताना ते म्हणाले की, संसद कायदे बनविण्याचे ठिकाण आहे. मात्र जनतेने कौल नाकारलेले लोक संसदेचे कामकाज रोखू पाहत आहेत. गरीबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन मी विरोधकांना करीत आहे. संसदेचे कामकाज हाणून पाडणाऱ्यांनी किमान नव्या वर्षांत तरी संसद सुरळीत चालू देण्याचा संकल्प सोडावा. संसदेच्या ताज्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसह काही महत्त्वपूर्ण विधेयके पारित होऊ शकली नाहीत. विरोधक संसद चालू देत नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला काँग्रेसने गुरुवारी सडेतोड उत्तर दिले. संसद सुरळीत चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळेच सरकारने आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसदेच्या कामकाजाला गती द्यावी, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले. संसद सरकार चालवते. विरोधकांची जबाबदारी जनतेचा आवाज बनून लढण्याची आहे, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)- मोदी आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्यात तरबेज आहेत. मात्र संसदेतील विरोधकांच्या गोंधळाबाबत त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज,अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर विविध प्रकरणांत आरोप लागले आहेत. मोदींनी या सर्वांना हटवले पाहिजे, असे रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले.