शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

साठीनंतर नेत्यांनी राजकारण सोडावे

By admin | Updated: November 16, 2015 00:15 IST

वयाची साठी ओलांडल्यानंतर राजकीय नेत्यांनी राजकारणातून स्वत:हून निवृत्त होत समाजसेवा करावी, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : वयाची साठी ओलांडल्यानंतर राजकीय नेत्यांनी राजकारणातून स्वत:हून निवृत्त होत समाजसेवा करावी, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना संबोधून शहा यांनी हा टोला लगावल्याचे मानले जात असतानाच, आपण असे काहीही म्हटलेच नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा शहा यांनी केला आहे.बिहार निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असा आग्रह धरत लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक साठी ओलांडलेल्या नेत्यांनी मोदी व शहांना लक्ष्य करीत घणाघाती टीकेचा वार केला होता. शनिवारी चित्रकुट येथे स्वामी रामभद्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक नानाजी देशमुख यांचा दाखला घेत, अप्रत्यक्षपणे पक्षातील ज्येष्ठांना लक्ष्य केले. नानाजी देशमुख यांनी साठी ओलांडल्यानंतर राजकीय संन्यास घेऊन सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. राजकीय नेत्यांसाठी नानाजी देशमुख एक आदर्श उदाहरण ठरावेत. राजकारण्यांनी साठी ओलांडल्यानंतर राजकारण सोडून सामाजिक सेवा करावी, असे शहा म्हणाले. अर्थात या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताच ते सारवासारव करताना दिसले.