शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

By admin | Updated: April 18, 2016 00:54 IST

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ५० वॅगन एका खेपेत आणण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे़ मात्र पाणी उतरवून घेण्याची क्षमता नसल्याने सद्य स्थितीत १० वॅगन एका खेपेत आणल्या जात आहेत़ ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे़ रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीपासून आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करण्यात येत असून, रविवारी या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले़ २ किमी अंतरापर्यंतचे खोदकाम पुर्ण झाले असून, प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईप बुजविण्यात आले आहेत़ शिवाय, विहिरीवर विद्युतपंप बसविण्याचे कामही सुरु झाले आहे़ सोमवारपर्यंत १२ पंप विहिरीवर बसविले जाणार आहेत़प्रगती कन्सट्रक्शन मार्फत पाईपलाईनचे काम करण्यात येत असून, शासनाकडून पाईपचा पुरवठा झाला नव्हता़ त्यामुळे केवळ खोदकाम सुरु होते़ शनिवारी रात्री पाईपचा पुरवठा झाला आहे़ गुजरात राज्यातून पाईप आले आहेत़ प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईपचा पुरवठा झाला असून, ते बसविण्यातही आले आहेत़ अन्य पाईप रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत़ त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पाईपलाईनचे काम पुर्ण होईल असे प्रगती कन्सट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले़ रविवारी सकाळी ९ वाजता मिरजेहून जलपरीची सहावी खेप झाली़ १० वॅगनमधील ५ लाख लिटर पाणी ४४ मिनीटांत उतरवून घेण्यात आले़ त्यानंतर विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात आले़ पाईपलाईन पुर्ण झाल्यानंतर ५० वॅगनची जलपरी येणार आहे़ हे पाणी उतरवून घेण्यासाठी विहिरीवर १२ पंप बसवून या पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे़ त्यासाठी ही पाईपलाईन करण्यात येत आहे़ २ किलोमीटर अंतराचे खोदकाम पुर्ण झाले असून, रविवारी आलेले ३४ पाईपही बुजविण्यात आले आहेत़ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेतील पाणी उतरविणे, साठविणे आणि टँकरद्वारे त्याची वाहतूक करण्याच्या कामाची पाहणी केली़