शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

By admin | Updated: April 18, 2016 00:54 IST

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ५० वॅगन एका खेपेत आणण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे़ मात्र पाणी उतरवून घेण्याची क्षमता नसल्याने सद्य स्थितीत १० वॅगन एका खेपेत आणल्या जात आहेत़ ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे़ रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीपासून आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करण्यात येत असून, रविवारी या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले़ २ किमी अंतरापर्यंतचे खोदकाम पुर्ण झाले असून, प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईप बुजविण्यात आले आहेत़ शिवाय, विहिरीवर विद्युतपंप बसविण्याचे कामही सुरु झाले आहे़ सोमवारपर्यंत १२ पंप विहिरीवर बसविले जाणार आहेत़प्रगती कन्सट्रक्शन मार्फत पाईपलाईनचे काम करण्यात येत असून, शासनाकडून पाईपचा पुरवठा झाला नव्हता़ त्यामुळे केवळ खोदकाम सुरु होते़ शनिवारी रात्री पाईपचा पुरवठा झाला आहे़ गुजरात राज्यातून पाईप आले आहेत़ प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईपचा पुरवठा झाला असून, ते बसविण्यातही आले आहेत़ अन्य पाईप रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत़ त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पाईपलाईनचे काम पुर्ण होईल असे प्रगती कन्सट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले़ रविवारी सकाळी ९ वाजता मिरजेहून जलपरीची सहावी खेप झाली़ १० वॅगनमधील ५ लाख लिटर पाणी ४४ मिनीटांत उतरवून घेण्यात आले़ त्यानंतर विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात आले़ पाईपलाईन पुर्ण झाल्यानंतर ५० वॅगनची जलपरी येणार आहे़ हे पाणी उतरवून घेण्यासाठी विहिरीवर १२ पंप बसवून या पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे़ त्यासाठी ही पाईपलाईन करण्यात येत आहे़ २ किलोमीटर अंतराचे खोदकाम पुर्ण झाले असून, रविवारी आलेले ३४ पाईपही बुजविण्यात आले आहेत़ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेतील पाणी उतरविणे, साठविणे आणि टँकरद्वारे त्याची वाहतूक करण्याच्या कामाची पाहणी केली़