शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पाईपलाईन जोडणीच्या कामाचा शुभारंभ

By admin | Updated: April 18, 2016 00:54 IST

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़

लातूर : मिरजहून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या ६ दिवसांपासून १० वॅगनची एक जलपरी दररोज ५ लाख लिटर पाणी घेऊन येत आहे़ ५० वॅगन एका खेपेत आणण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे़ मात्र पाणी उतरवून घेण्याची क्षमता नसल्याने सद्य स्थितीत १० वॅगन एका खेपेत आणल्या जात आहेत़ ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यासाठी पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे़ रेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीपासून आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन करण्यात येत असून, रविवारी या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले़ २ किमी अंतरापर्यंतचे खोदकाम पुर्ण झाले असून, प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईप बुजविण्यात आले आहेत़ शिवाय, विहिरीवर विद्युतपंप बसविण्याचे कामही सुरु झाले आहे़ सोमवारपर्यंत १२ पंप विहिरीवर बसविले जाणार आहेत़प्रगती कन्सट्रक्शन मार्फत पाईपलाईनचे काम करण्यात येत असून, शासनाकडून पाईपचा पुरवठा झाला नव्हता़ त्यामुळे केवळ खोदकाम सुरु होते़ शनिवारी रात्री पाईपचा पुरवठा झाला आहे़ गुजरात राज्यातून पाईप आले आहेत़ प्रति ५़५० मीटरचे ३४ पाईपचा पुरवठा झाला असून, ते बसविण्यातही आले आहेत़ अन्य पाईप रविवारी रात्रीपर्यंत प्राप्त होणार आहेत़ त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पाईपलाईनचे काम पुर्ण होईल असे प्रगती कन्सट्रक्शनचे संचालक गोविंदराव माकणे यांनी सांगितले़ रविवारी सकाळी ९ वाजता मिरजेहून जलपरीची सहावी खेप झाली़ १० वॅगनमधील ५ लाख लिटर पाणी ४४ मिनीटांत उतरवून घेण्यात आले़ त्यानंतर विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकण्यात आले़ पाईपलाईन पुर्ण झाल्यानंतर ५० वॅगनची जलपरी येणार आहे़ हे पाणी उतरवून घेण्यासाठी विहिरीवर १२ पंप बसवून या पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे़ त्यासाठी ही पाईपलाईन करण्यात येत आहे़ २ किलोमीटर अंतराचे खोदकाम पुर्ण झाले असून, रविवारी आलेले ३४ पाईपही बुजविण्यात आले आहेत़ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेतील पाणी उतरविणे, साठविणे आणि टँकरद्वारे त्याची वाहतूक करण्याच्या कामाची पाहणी केली़