शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

By admin | Updated: November 14, 2015 00:06 IST

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.
गुरूवारी सायंकाळी ७ वाजता वहनोत्सवातील प्रथम घोड्याच्या वहनाच्या पूजनास प्रारंभ झाला. संस्थानचे प्रमुख विश्वस्त, गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शहरातील समस्त ब्रšावृंद यांच्या उपस्थितीत व वेद मंत्राच्या घोषात विधीवत वहनपूजन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, नगरसेवक बनसोडे, विश्वस्त वसंतराव जोशी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सुजीत पाटील, विलास चौधरी, ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त दीपक जोशी, बजरंग दलाचे मनोज चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दादा नेवे यांनी केले. पौराहित्य नंदू शुक्ल यांनी केले, त्यांना मुकूंद धर्माधिकारी यांनी सहकार्य केले. यानंतर प्रभू रामचंद्रांची महाआरती होऊन नंतर वहनोत्सवास प्रारंभ झाला. सद्गुरू आप्पा महाराजांचा जयघोषही यावेळी करण्यात येत होता.
-----
सनईचे सूर अन् चौघडा
घोड्याच्या वहनापुढे सनई, गुरव, वाजंत्री पथक, बॅँड पथक, झेंडेकरी, भजनी मंडळ त्यानंतर संत मुक्ताबाई पादुका पालखी त्यामगे वहन अशी पारंपरिक पद्धतीने वहनास सुरूवात झाली. सराफ बाजारातील भवानी मंदिरात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर यानंतर बालाजी पेठेतील बालाजी मंदिरात पानसुपारी व भारूडाचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते आरती झाली.
-----
रात्री ११.३० वाजेपर्यंत वहन पुन्हा श्रीराम मंदिरात आले. ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. वहनोत्सवाकरीता भानुदास चौधरी, मुकंदा पाटील, कालिदास खडके, दिलीप कुलकर्णी, महेंद्र जोशी, श्रीराम जोशी, सुनील पाटील, विकास शुक्ल, दिनेश धांडे, राजू काळे, खंडू तांबट, अविनाश येवले, जितेंद्र वाळके, परिष तांबट, गणेश दायमा, देवेश पाठक, उदय बुवा, रोहीत माळी, देवेंद्र कोळी, केशव बारी, दिलीप कोळी, जगन शिंपी, रोहित भिंगारे यांनी परिश्रम घेतले.