शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
4
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
5
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
6
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
7
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
8
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
9
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
10
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
11
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
12
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
13
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
14
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
15
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
16
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
17
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
18
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
19
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
20
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

By admin | Updated: November 14, 2015 00:06 IST

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.
गुरूवारी सायंकाळी ७ वाजता वहनोत्सवातील प्रथम घोड्याच्या वहनाच्या पूजनास प्रारंभ झाला. संस्थानचे प्रमुख विश्वस्त, गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शहरातील समस्त ब्रšावृंद यांच्या उपस्थितीत व वेद मंत्राच्या घोषात विधीवत वहनपूजन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, नगरसेवक बनसोडे, विश्वस्त वसंतराव जोशी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सुजीत पाटील, विलास चौधरी, ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त दीपक जोशी, बजरंग दलाचे मनोज चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दादा नेवे यांनी केले. पौराहित्य नंदू शुक्ल यांनी केले, त्यांना मुकूंद धर्माधिकारी यांनी सहकार्य केले. यानंतर प्रभू रामचंद्रांची महाआरती होऊन नंतर वहनोत्सवास प्रारंभ झाला. सद्गुरू आप्पा महाराजांचा जयघोषही यावेळी करण्यात येत होता.
-----
सनईचे सूर अन् चौघडा
घोड्याच्या वहनापुढे सनई, गुरव, वाजंत्री पथक, बॅँड पथक, झेंडेकरी, भजनी मंडळ त्यानंतर संत मुक्ताबाई पादुका पालखी त्यामगे वहन अशी पारंपरिक पद्धतीने वहनास सुरूवात झाली. सराफ बाजारातील भवानी मंदिरात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर यानंतर बालाजी पेठेतील बालाजी मंदिरात पानसुपारी व भारूडाचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते आरती झाली.
-----
रात्री ११.३० वाजेपर्यंत वहन पुन्हा श्रीराम मंदिरात आले. ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. वहनोत्सवाकरीता भानुदास चौधरी, मुकंदा पाटील, कालिदास खडके, दिलीप कुलकर्णी, महेंद्र जोशी, श्रीराम जोशी, सुनील पाटील, विकास शुक्ल, दिनेश धांडे, राजू काळे, खंडू तांबट, अविनाश येवले, जितेंद्र वाळके, परिष तांबट, गणेश दायमा, देवेश पाठक, उदय बुवा, रोहीत माळी, देवेंद्र कोळी, केशव बारी, दिलीप कोळी, जगन शिंपी, रोहित भिंगारे यांनी परिश्रम घेतले.