शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने निनादले शहर वहनोत्सवास प्रारंभ: टाळ, मुदंुगाचा गजर, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी वहनाचे स्वागत

By admin | Updated: November 14, 2015 00:06 IST

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत प्रारंभीक घोड्याच्या वहनास उत्साहात प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांचा नामजप करत टाळ, मृदुंगांचा गजर करत निघालेल्या वहनाचे रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात, रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले.
गुरूवारी सायंकाळी ७ वाजता वहनोत्सवातील प्रथम घोड्याच्या वहनाच्या पूजनास प्रारंभ झाला. संस्थानचे प्रमुख विश्वस्त, गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शहरातील समस्त ब्रšावृंद यांच्या उपस्थितीत व वेद मंत्राच्या घोषात विधीवत वहनपूजन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, नगरसेवक बनसोडे, विश्वस्त वसंतराव जोशी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, सुजीत पाटील, विलास चौधरी, ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त दीपक जोशी, बजरंग दलाचे मनोज चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दादा नेवे यांनी केले. पौराहित्य नंदू शुक्ल यांनी केले, त्यांना मुकूंद धर्माधिकारी यांनी सहकार्य केले. यानंतर प्रभू रामचंद्रांची महाआरती होऊन नंतर वहनोत्सवास प्रारंभ झाला. सद्गुरू आप्पा महाराजांचा जयघोषही यावेळी करण्यात येत होता.
-----
सनईचे सूर अन् चौघडा
घोड्याच्या वहनापुढे सनई, गुरव, वाजंत्री पथक, बॅँड पथक, झेंडेकरी, भजनी मंडळ त्यानंतर संत मुक्ताबाई पादुका पालखी त्यामगे वहन अशी पारंपरिक पद्धतीने वहनास सुरूवात झाली. सराफ बाजारातील भवानी मंदिरात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर यानंतर बालाजी पेठेतील बालाजी मंदिरात पानसुपारी व भारूडाचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते आरती झाली.
-----
रात्री ११.३० वाजेपर्यंत वहन पुन्हा श्रीराम मंदिरात आले. ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. वहनोत्सवाकरीता भानुदास चौधरी, मुकंदा पाटील, कालिदास खडके, दिलीप कुलकर्णी, महेंद्र जोशी, श्रीराम जोशी, सुनील पाटील, विकास शुक्ल, दिनेश धांडे, राजू काळे, खंडू तांबट, अविनाश येवले, जितेंद्र वाळके, परिष तांबट, गणेश दायमा, देवेश पाठक, उदय बुवा, रोहीत माळी, देवेंद्र कोळी, केशव बारी, दिलीप कोळी, जगन शिंपी, रोहित भिंगारे यांनी परिश्रम घेतले.