शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

मोदींच्या स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ

By admin | Updated: January 16, 2016 21:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवारी नवी दिल्ली येथे स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१६ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्टार्ट अप सुरू व्हावेत यासाठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून स्टार्टअपला तीन वर्षांसाठी कर माफ करण्यात येणार आहे. तसेच, भारत पेटंट फी ८० टक्क्यांनी कमी करणार येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. 
या स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या कार्यक्रमात अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपन्यांचे ४८ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. तसेच, इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप कंपन्या, आयस्प्रिट, युवरस्टोरी, नास्कॉम, शी द पीपल टीव्ही, कॅरोस सोसायटी आणि फिक्की व सीआयआयच्या युवा शाखा आणि औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात १५०० पेक्षा अधिक स्टार्टअप प्रमुखही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी हे स्टार्टअपच्या व्हॅच्युअल प्रदर्शनीची पाहणी करत स्टार्टअप उद्योजकांसोबत चर्चा केली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे : -
- स्टार्टअपला तीन वर्षांसाठी कर माफ करण्यात येणार 
-पेटंट रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी वेगळी योजना आणणार, व त्यासाठी सरकार सहाय्यता करणार.
- स्टार्टअप प्लॅनमधल्या action plan मध्ये सेल्फसर्टिफिकेशनवर आधारीत व्यवस्था, तीन वर्षे कुठलंही इन्स्पेक्शन होणार नाही, तसेच सरकारचा त्रास होणार नाही याची आमची काळजी घेणार
- भारतात लाखो समस्या असतील पण त्यापेक्षा जास्त मेंदू आहेत, त्यामुळे समस्यांची चिंता करायची गरज नाही. 
- ज्यावेळी मी स्टार्ट अप इंडिया म्हणतो त्यावेळी स्टँड अप इंडिया हे गृहीत आहे. 
-  गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा.
- आम्ही मेक इन इंडिया म्हणतो, त्यावेळीच मेक फॉर इंडियापण म्हणतो कारण भारत सव्वा अब्ज लोकांचं हे मार्केट आहे. 
- केवळ पाच लोकांना रोजगार देणारा स्टार्टअप असेल तरी तो देशाला पुढे नेणारा असेल. 
- सध्या स्टार्टअप फक्त आयटी पुरतं मर्यादीत आहे, आयटीच्या पलीकडे स्टार्टअपचं काम जायला हवं. 
 - पैसे कमावण्यासाठी सुरू केलेलं स्टार्टअप यशस्वी होत नाही, परंतु लोकांची समस्या सोडवण्यासाठी सुरू केलेलं स्टार्टअप यशस्वी होतं आणि पैसा हा बायप्रॉडक्ट बनून मागे मागे येतो.
 - जेव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली जाते, तेव्हा ती करणा-यालाच दिसत असतं की काय मिळणार आहे, इतरांना ते वेडच वाटतं.
 - आम्ही राजकारणी लोकांनी काय नाही करायचं हे ठरवलं तर उद्योजक १० वर्षांत देशाला कुठच्या कुठे नेऊन ठेवतील. 
- मला कधी कधी वाटतं की मी तुमच्यासारखा उद्योजक का नाही झालो?