शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

भूसंपादनावरून पेच!

By admin | Updated: February 26, 2015 03:11 IST

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर

नवी दिल्ली/मुंबई : भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन करताना या शेतकरीविरोधी विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करण्याचे ऐलान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे आपले आक्षेप नोंदविले; तर केंद्रात व राज्यातही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विधेयकाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवा, असा स्पष्ट आदेशच जिल्हाप्रमुखांना दिला आहे. विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने ‘जमीन वापसी’ रॅलीचे आयोजन करताना अण्णा हजारे यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची याद जागवली. अण्णांनी दिल्लीतील जंतरमंतरवर भूसंपादन विधेयकाविरुद्ध दोन दिवस आंदोलन केले होते. काँग्रेसनेही जंतरमंतरवरच आंदोलन केले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीविना झालेल्या बुधवारच्या आंदोलनात दिग्विजयसिंग, राज बब्बर, जयराम रमेश आणि सुबोधकांत सहाय यांच्यासह अंदाजे दोन हजार कार्यकर्ते सामील झाले होते.> उद्धव म्हणतात, रान उठवाजमीन संपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, ही बाब गावागावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या संपर्कप्रमुखांना दिला. नव्याने नेमलेल्या संपर्कप्रमुखांची ठाकरे यांनी बैठक घेतली. सध्या केंद्रात व राज्यात काय सुरू आहे ते वेगळे सांगायची गरज नाही, असे नमूद करून ठाकरे यांनी जमीन संपादन कायद्यातील काही बदलांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहिली असून, यापुढेही राहणार असे त्यांनी बजावले.> मोदी सरकारने जे भूमी अधिग्रहण विधेयक मांडले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला या तीन मुद्यांवर आक्षेप आहे. सरकारसोबत जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा बदल आम्हाला अजिबात मान्य नाही, असे आम्ही सांगू. या बदलाला आमचा विरोध असल्याने विधेयकालाही आम्ही विरोध करू. - शरद पवार