शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

भूसंपादनावरून पेच!

By admin | Updated: February 26, 2015 03:11 IST

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर

नवी दिल्ली/मुंबई : भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन करताना या शेतकरीविरोधी विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करण्याचे ऐलान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे आपले आक्षेप नोंदविले; तर केंद्रात व राज्यातही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विधेयकाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवा, असा स्पष्ट आदेशच जिल्हाप्रमुखांना दिला आहे. विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने ‘जमीन वापसी’ रॅलीचे आयोजन करताना अण्णा हजारे यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची याद जागवली. अण्णांनी दिल्लीतील जंतरमंतरवर भूसंपादन विधेयकाविरुद्ध दोन दिवस आंदोलन केले होते. काँग्रेसनेही जंतरमंतरवरच आंदोलन केले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीविना झालेल्या बुधवारच्या आंदोलनात दिग्विजयसिंग, राज बब्बर, जयराम रमेश आणि सुबोधकांत सहाय यांच्यासह अंदाजे दोन हजार कार्यकर्ते सामील झाले होते.> उद्धव म्हणतात, रान उठवाजमीन संपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, ही बाब गावागावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या संपर्कप्रमुखांना दिला. नव्याने नेमलेल्या संपर्कप्रमुखांची ठाकरे यांनी बैठक घेतली. सध्या केंद्रात व राज्यात काय सुरू आहे ते वेगळे सांगायची गरज नाही, असे नमूद करून ठाकरे यांनी जमीन संपादन कायद्यातील काही बदलांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहिली असून, यापुढेही राहणार असे त्यांनी बजावले.> मोदी सरकारने जे भूमी अधिग्रहण विधेयक मांडले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला या तीन मुद्यांवर आक्षेप आहे. सरकारसोबत जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा बदल आम्हाला अजिबात मान्य नाही, असे आम्ही सांगू. या बदलाला आमचा विरोध असल्याने विधेयकालाही आम्ही विरोध करू. - शरद पवार