शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केजरीवालांची चौकशी होणार ?

By admin | Updated: April 25, 2015 04:26 IST

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील रॅलीत गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने केलेली आत्महत्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरू पाहात आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील रॅलीत गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने केलेली आत्महत्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरू पाहात आहे. केजरीवाल यांनी मागितलेली माफी धुडकावून लावणाऱ्या गजेंद्रच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीचा आग्रह धरला आहे. तशातच केजरीवाल यांची चौकशी करण्याचा पवित्रा घेतलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यासाठी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे परवानगी मागितली आहे. शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या आत्महत्येची स्वत:हून दखल घेण्याचे ठरविले आहे.आपच्या रॅलीत राजस्थानातील गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतरही सभा सुरूच ठेवल्याबद्दल केजरीवाल यांनी शुक्रवारी अखेर माफी मागितली. भाषण सुरूच ठेवणे ही आपली चूक होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी राजधानीतील जंतरमंतर येथे घडलेल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेमुळे चौफेर टीकेची झोड उठली होती. केजरीवाल यांनी माफी  मागताना प्रसिद्धी माध्यमे आणि विरोधी पक्षांची मात्र निंदा केली. कृपा करून शेतकऱ्यांच्या वास्तविक मुद्यांवर लक्ष केंद्रित करा. त्याचे राजकारण करू नका. या घटनेत जो कुणी दोषी असेल त्याला फाशी द्या. मात्र चर्चा शेतकरी का आत्महत्या करतो आहे या मुद्यावरच केंद्रित असली पाहिजे,असे आवाहन केजरीवाल यांनी केले. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांवर उखडणाऱ्या केजरीवाल यांनी नरमाईचे धोरण अवलंबून सर्वच पोलीस वाईट आहेत असे आमचे म्हणणे नाही. पोलिसांना पुसटशीही कल्पना असती तर त्यांनी शेतकऱ्याचा वाचविण्याचा निश्चित प्रयत्न केला,असे प्रतिपादन केले. शहीद घोषित करण्याची मागणीराजस्थानच्या नांगल झामरवाडा येथे गजेंद्रच्या कुटुंबीयांनी या घटनेमागे कटकारस्थानाचा संशय व्यक्त करतानाच गजेंद्रला शहीद घोषित करण्यात यावे आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या पॅकेजचे नामकरण त्याच्या नावे केले जावे, अशी मागणी केली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना माहिती देण्यास पोलिसांचा नकारआपच्या किसान रॅलीत शेतकरी आत्महत्याप्रकरणी सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली होती. परंतु कालमर्यादा संपल्यानंतरही दिल्ली पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती देण्यास पुन्हा एकदा नकार दिला. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देणाऱ्या दिल्ली सरकारच्या अधिकार क्षेत्रात हा विषय येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.