शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

केजरी-जंग सत्तासंघर्ष शिगेला

By admin | Updated: June 2, 2015 23:27 IST

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) बिहारमधील पाच अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या निर्णयावर नायब राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर दिल्ली सरकारने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्याचे झाले असे की, आप सरकारतर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कार्यालयाला विनंती करण्यात आल्यानंतर बिहार पोलीस विभागातील तीन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक दिल्लीच्या एसीबीत सामील झाले आणि येथेच वादाची ठिणगी पडली. नायब राज्यपालांनी आप सरकारच्या या निर्णयावर कठोर पवित्रा घेत तडकाफडकी या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नायब राज्यपालांच्या प्रत्यक्ष अधिकार व नियंत्रणात असल्याचे ठासून सांगितले. विशेष म्हणजे केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपालांदरम्यान अधिकार क्षेत्रावरून युद्ध पेटले असताना या नियुक्त्या झाल्या आहेत.एसीबी, दिल्ली एका पोलीस ठाण्याच्या रूपात नायब राज्यपालांच्या नियंत्रणात आणि देखरेखीखाली कार्यरत आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतही (संख्या १३६८ ई) हे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना बिहार पोलिसांच्या नियुक्तीशी संबंधित कुठलाही प्रस्ताव अद्याप नायब राज्यपालांकडे आलेला नाही. दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याचे संपूर्ण अध्ययन केले जाईल, असे जंग यांच्या कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)