शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

केजरी-जंग सत्तासंघर्ष शिगेला

By admin | Updated: June 2, 2015 23:27 IST

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) बिहारमधील पाच अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या निर्णयावर नायब राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर दिल्ली सरकारने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्याचे झाले असे की, आप सरकारतर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कार्यालयाला विनंती करण्यात आल्यानंतर बिहार पोलीस विभागातील तीन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक दिल्लीच्या एसीबीत सामील झाले आणि येथेच वादाची ठिणगी पडली. नायब राज्यपालांनी आप सरकारच्या या निर्णयावर कठोर पवित्रा घेत तडकाफडकी या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नायब राज्यपालांच्या प्रत्यक्ष अधिकार व नियंत्रणात असल्याचे ठासून सांगितले. विशेष म्हणजे केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपालांदरम्यान अधिकार क्षेत्रावरून युद्ध पेटले असताना या नियुक्त्या झाल्या आहेत.एसीबी, दिल्ली एका पोलीस ठाण्याच्या रूपात नायब राज्यपालांच्या नियंत्रणात आणि देखरेखीखाली कार्यरत आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतही (संख्या १३६८ ई) हे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना बिहार पोलिसांच्या नियुक्तीशी संबंधित कुठलाही प्रस्ताव अद्याप नायब राज्यपालांकडे आलेला नाही. दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याचे संपूर्ण अध्ययन केले जाईल, असे जंग यांच्या कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)