शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कारकून, शिक्षक न होता उच्च ध्येय ठेवा

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

जळगाव : काळनुरूप शिक्षण क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ कारकून किंवा शिक्षक व्हायचंय यापुरता मर्यादीत राहू नका; तर उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने विद्यार्थ्यांनी पुढे आगेकूच करावी, असा सल्ला पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.

जळगाव : काळनुरूप शिक्षण क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केवळ कारकून किंवा शिक्षक व्हायचंय यापुरता मर्यादीत राहू नका; तर उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने विद्यार्थ्यांनी पुढे आगेकूच करावी, असा सल्ला पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी पतपेढीतर्फे रविवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात पतपेढीच्या सभासदांचे गुणवंत पाल्य व आदर्श शिक्षकांच्या सतत्काराप्रसंगी ते बोलत होते.
मंचावर खासदार ए. टी. पाटील, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन (माध्यमिक), भास्कर पाटील (प्राथमिक), माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील, उप शिक्षणाधिकारी एस. टी. वराडे, किशोर वायकोळे, विकास पाटील गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, विजय पवार, पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने कर्ज द्या!
जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीद्वारे अतिशय कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. परंतु, कर्ज देणे आणि ते वसूल करणे असा उद्देश ठेऊ नका. कर्जदाराच्या सर्वांगिण विकास होईल, यादृष्टीने कर्ज द्यावे, असे आवाहन खडसे यांनी केले.
पेपरलेस प्रणाली सुरू करा
जिल्हा माध्यमिक पतपेढी ५१ वर्षापासून चांगले काम करत आहे. सभासद हिताच्या दृष्टीने विविध योजना पतपेढीने सुरू केल्या आहेत. परंतु, पतपेढीने सभासदांना ऑनलाईन कर्ज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था निर्माण करावी. सभासदांना कर्जासाठी विविध कागदपत्र व त्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागू नये, म्हणून पेपरलेस प्रणाली सुरू करावी. त्यामुळे सभासदांचा वेळेचा अपव्यय होणार नाही. पूर्वी जिल्हा बॅँकेच्या शाखेतून कर्ज घेणार्‍या कर्ज दाराच्या बॅँक खात्यातून कपात होत नव्हती. परंतु, आता या बॅँकेत बॅँकिंग प्रणाली अंतर्गत थेट कर्जदाराच्या बॅँक खात्यातून कर्जाची वसुली होत आहे. याचे श्रेय त्यांनी विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचे असल्याचे खडसे यांनी नमूद केले.