शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

भयभीत नेपाळी सोडतायत काठमांडू

By admin | Updated: April 27, 2015 23:20 IST

शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले

काठमांडू : शनिवारी आलेल्या विनाशी भूकंपानंतर दोन दिवस पाठोपाठ बसणारे भूकंपाचे धक्के , अन्नधान्य व पाण्याचा तुटवडा यामुळे नेपाळी लोक बेजार व भयभीत झाले असून, हजारोंच्या संख्येने लोक काठमांडू शहरातून बाहेर पडत आहेत. काठमांडू शहरातून बाहेर पडण्याचे रस्ते माणसांनी फुलून गेले असूृन, ट्रॅफिक जाम होत आहे. अनेकांच्या हातात लहान मुले आहेत, लोक बस, कार मिळेल त्या मार्गाने काठमांडूबाहेर पडत आहेत. पाणी व वीज यांचा तुटवडा भूकंपग्रस्त भागात पाणी व वीज नाही. वीज व पाणी पुरवणे हे आमच्यासाठी मुख्य आव्हान आहे. त्यापाठोपाठ लोकांना अन्न पुरविले पाहिजे असे गृहमंत्रालयातील अधिकारी लक्ष्मीप्रसाद ढाकल यांनी सांगितले. भारताने औषधे व आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य पाठवले आहेत. चीनने आणीबाणी पथकाचे ६० सदस्य पाठवले आहेत. अमेरिका, ब्रिटन व आॅस्ट्रेलिया यांनी शहरी भागात ढिगाऱ्यातून शोध घेऊ शकणाऱ्या तज्ज्ञांची पथके व औषधे पाठविली आहेत; पण आंतरराष्ट्रीय मदत अद्याप भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. कारण भूकंपाच्या पाठोपाठ बसणाऱ्या धक्क्यामुळे काठमांडूचा विमानतळ बंद ठेवावा लागत आहे. ४२०११ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची लोकसंख्या २८ दशलक्ष असून तिथे दर १० हजार नागरिकांसाठी फक्त २.१ डॉक्टर व ५० खाटांचे इस्पितळ आहे. विमानतळावर गर्दी ४काठमांडू विमानतळावर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत असून, नेपाळबाहेर पडण्यासाठी लोक उतावीळ झाले आहेत. शनिवारच्या भूकंपानंतर लोक खुल्या जागेत झोपत आहेत, एक तर लोकांची घरे पडली आहेत किंवा भूकंपाच्या भीतीने घरात जाण्याचे लोकांचे धाडस होत नाही. काठमांडू शहरात व बाहेरच्या भागात लोकांनी रस्त्यावर गाद्या घातल्या आहेत. पाऊस व ऊन यापासून सावली मिळावी म्हणून तंबू उभारले आहेत. बाहेरच्या देशातून येणारे पाणी मिळविण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. काही दुकाने आता उघडत आहेत, पण ती रिकामी आहेत.