शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

काश्मीरचा विशेष दर्जा कायमस्वरूपी

By admin | Updated: October 12, 2015 07:09 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी आहे.

श्रीनगर : काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी आहे. राज्यघटनेतील या तरतुदींचा त्याग केला जाऊ शकत नाही, त्या रद्द केल्या जाऊ शकत नाहीत अथवा त्यात बदलही केला जाऊ शकत नाही, असा निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.न्या. हसनैन मसुदी आणि न्या. राज कोटवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ६० पानी निकाल देताना, राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी असल्याचे नमूद केले. कलम ३५ ए जम्मू-काश्मिरात लागू विद्यमान कायद्यांना संरक्षण देणारे कलम असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ‘तात्पुरती तरतूद’ या शीर्षकाखाली आणि परिच्छेद २१ मध्ये ‘तात्पुरती, परिर्वनशील व विश्ोष तरतूद’ या शीर्षकाखाली सामील करण्यात आलेल्या कलम ३७० ने राज्यघटनेत अढळ स्थान निर्माण केले आहे. या अनुच्छेदात बदल केला जाऊ शकत नाही, त्याचा त्याग केला जाऊ शकत नाही आणि ते रद्दही करता येऊ शकत नाही. कारण देशाच्या संविधान सभेने विसर्जित होण्यापूर्वी या अनुच्छेदात दुरुस्तीची वा ती रद्द करण्याची कुठलीही शिफारस केलेली नव्हती, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरच्या जनतेने धर्माधिष्ठित पाकिस्तानात जाण्याऐवजी भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि विशेष परिस्थितीत जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या ३७० कलमाची निर्मिती झाली. या कलमामुळे जम्मू काश्मीर राज्याला अन्य राज्यांच्या तुलनेत विशेष स्थान आणि दर्जा मिळाला आहे.(वृत्तसंस्था)——————संविधान सभेलाच अधिकारकलम ३७० (३)च्या तरतुदीसंदर्भात संविधान सभा राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्याची वा त्यात दुरुस्ती करण्याची शिफारस करू शकते.मात्र २५ जानेवारी १९५७ रोजी विसर्जित होण्यापूर्वी संविधान सभेने अशी कुठलीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे कलम ३७० चा तात्पुरती तरतूद असा उल्लेख असला तरी आता ते राज्यघटनेतील कायमस्वरूपी कलम वा तरतूद झाली आहे. कलम ३५ ए, तसेच कलम ३७० च्या तरतुदी शिवाय कलम ३६८ राज्यघटनेशी जोडण्यात आल्या आहेत आणि त्या राज्यास लागू आहेत. कलम ३५ ए राज्यातील विद्यमान कायदे तसेच १९५४ नंतर राज्य विधिमंडळाने लागू केलेल्या सर्व कायद्यांना संरक्षण देते, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.