शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

काश्मीरचा विशेष दर्जा कायमस्वरूपी

By admin | Updated: October 12, 2015 07:09 IST

काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी आहे.

श्रीनगर : काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी आहे. राज्यघटनेतील या तरतुदींचा त्याग केला जाऊ शकत नाही, त्या रद्द केल्या जाऊ शकत नाहीत अथवा त्यात बदलही केला जाऊ शकत नाही, असा निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.न्या. हसनैन मसुदी आणि न्या. राज कोटवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ६० पानी निकाल देताना, राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० व अनुच्छेद ३५ ए कायमस्वरूपी असल्याचे नमूद केले. कलम ३५ ए जम्मू-काश्मिरात लागू विद्यमान कायद्यांना संरक्षण देणारे कलम असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ‘तात्पुरती तरतूद’ या शीर्षकाखाली आणि परिच्छेद २१ मध्ये ‘तात्पुरती, परिर्वनशील व विश्ोष तरतूद’ या शीर्षकाखाली सामील करण्यात आलेल्या कलम ३७० ने राज्यघटनेत अढळ स्थान निर्माण केले आहे. या अनुच्छेदात बदल केला जाऊ शकत नाही, त्याचा त्याग केला जाऊ शकत नाही आणि ते रद्दही करता येऊ शकत नाही. कारण देशाच्या संविधान सभेने विसर्जित होण्यापूर्वी या अनुच्छेदात दुरुस्तीची वा ती रद्द करण्याची कुठलीही शिफारस केलेली नव्हती, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरच्या जनतेने धर्माधिष्ठित पाकिस्तानात जाण्याऐवजी भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि विशेष परिस्थितीत जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या ३७० कलमाची निर्मिती झाली. या कलमामुळे जम्मू काश्मीर राज्याला अन्य राज्यांच्या तुलनेत विशेष स्थान आणि दर्जा मिळाला आहे.(वृत्तसंस्था)——————संविधान सभेलाच अधिकारकलम ३७० (३)च्या तरतुदीसंदर्भात संविधान सभा राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्याची वा त्यात दुरुस्ती करण्याची शिफारस करू शकते.मात्र २५ जानेवारी १९५७ रोजी विसर्जित होण्यापूर्वी संविधान सभेने अशी कुठलीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे कलम ३७० चा तात्पुरती तरतूद असा उल्लेख असला तरी आता ते राज्यघटनेतील कायमस्वरूपी कलम वा तरतूद झाली आहे. कलम ३५ ए, तसेच कलम ३७० च्या तरतुदी शिवाय कलम ३६८ राज्यघटनेशी जोडण्यात आल्या आहेत आणि त्या राज्यास लागू आहेत. कलम ३५ ए राज्यातील विद्यमान कायदे तसेच १९५४ नंतर राज्य विधिमंडळाने लागू केलेल्या सर्व कायद्यांना संरक्षण देते, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.