शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी पंडित पलायनाच्या मार्गावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 04:18 IST

काश्मीर खोऱ्यातील दगडफेक व हिंसाचारामुळे खोऱ्यातील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतीसाठी देशाच्या राजधानीत मोहीम

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली काश्मीर खोऱ्यातील दगडफेक व हिंसाचारामुळे खोऱ्यातील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतीसाठी देशाच्या राजधानीत मोहीम चालू असताना खोऱ्यातील पंडित मात्र घाबरून पलायनाच्या तयारीत आहेत. हिंसाचारामुळे काश्मिरी पंडितांना चिंतेने पछाडले आहे. दिल्लीत अ.भा. काश्मिरी पंडित समुदायाचे उपाध्यक्ष एम.एल. भल्ला यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली. यापाठोपाठ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. काश्मिरी पंडित कुटुंबांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रयत्न चालवले आहेत.पंतप्रधानांचे आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. परदेशातून येताच त्यांनी मंगळवारी सकाळी गृहमंत्री राजनाथसिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.पर्यटकांची अक्षरश: लूटश्रीनगर व काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराचा पुरेपूर गैरवाजवी लाभ प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअरलाइन्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी उठवला आहे. हिंसाचारात अथवा संकटात अडकलेले पर्यटक तसेच अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या अडचणीचा पुरेपूर फायदा उठवीत, त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत.