शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कामतांच्या राजीनाम्याने खळबळ

By admin | Updated: June 8, 2016 04:51 IST

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव गुरुदास कामत काँग्रेसचे अविभाज्य घटक असून, कोणत्याही स्थितीत त्यांच्यासारख्या नेत्याला आम्ही गमावणार नाही.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- पक्षाचे राष्ट्रीय महासचिव गुरुदास कामत काँग्रेसचे अविभाज्य घटक असून, कोणत्याही स्थितीत त्यांच्यासारख्या नेत्याला आम्ही गमावणार नाही. कामतांंच्या नाराजीची जी काही कारणे असतील, त्याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्याशी चर्चा करतील आणि हे मळभ लवकरच दूर होईल, असा खुलासा पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुदास कामत यांची समजूत घालण्याची विशेष जबाबदारी सोनिया गांधींनी अहमद पटेल यांच्यावर सोपवली आहे.मुंबई काँग्रेसमधील संजय निरूपम यांची मनमानी हे कामत यांच्या राजीनाम्याचे महत्त्वाचे कारण असले तरी संघटनेत महाराष्ट्र व मुंबईचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या हस्तक्षेपाला मुंबईसह राज्यातील काँग्रेसजन कंटाळले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा पराभव होत असूनही संघटनेत विविध पदांचे लिलाव होत असल्याच्या तक्रारी आहेत. कामत यांनी या तक्रारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधींच्या कानावर घातल्या होत्या, असे समजते. तथापि त्यानंतरही मुंबई अथवा महाराष्ट्राच्या संघटनात्मक कामकाजात कोणताही दृश्य बदल होत नव्हता.काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधींकडे सोपवण्याचा मुहूर्त उजाडण्याआधीच पक्षात बेदिलीचा माहोल पसरला आहे. जून महिन्याच्या मध्यावर राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपवले जाईल आणि संघटनेतही मोठे फेरबदल होतील याचे सुतोवाच सुरू होताच, काही विद्यमान सरचिटणीसांनी राजीनामे देण्याची इच्छा सोनिया गांधींकडे व्यक्त केली. गुजरात व राजस्थानचे प्रभारी कामत त्यात आघाडीवर होते. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून सोनिया गांधींनी कामत यांच्याकडे राजस्थान व गुजरातचे प्रभारीपद सोपवले होते. या दोन्ही राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांत कामत यांनी जान आणली. प्रत्येक जिल्ह्यात फिरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना यश मिळवून दिले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दोन्ही राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी कामत यांच्या कार्यशैलीची जाहीर तारीफही केली होती. त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मात्र पक्ष संकटात असूनही कामत यांच्या सहकारी कार्यक र्त्यांचे पंख छाटत सुटले होते. कामतांच्या लोकसभा मतदारसंघातही निरुपम यांनी हस्तक्षेप सुरू केल्यानंतर ते संतापले होते. यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच कामत यांनी राजीनामाअस्त्र परजून झटका दिला. >दिग्गजांनाही खडबडून जाग कामत यांच्या राजीनामा प्रकरणामुळे राहुल गांधींभोवती घोटाळणारे नेते व पक्षातल्या दिग्गजांनाही खडबडून जाग आली असून, त्याची गांभीर्याने दखल पक्षाच्या पुनर्रचनेत घेतली जाते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कामत पुन्हा पक्षात येणार का, हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र ते आले वा न आले तरी पक्ष संघटनेत मोठे बदल अपेक्षित असून, त्यात तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेल्या नेत्यांनाच महत्त्व मिळेल, असे दिसते.