शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

पावसाळयापर्यंत पाणी कपातीचे संकट नाही कल्याण-डोंबिवली : पुर्ण संकट टळलेले नाही

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

अनिकेत घमंडी

अनिकेत घमंडी
डोंबिवली : सुमारे १६ लाख कल्याण-डोंबिवलीकरांवर पावसाळा पूर्ण होईस्तोवर पाणी कपातीचे संकट ओढावणार नसल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु, त्यानंतर मात्र जलसिंचन विभागाने निर्णय घेतल्यास गतवर्षीपेक्षाही जास्त पाणी कपात होणार आहे.
महापालिका हद्दीत सध्या २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत केले जाते. त्या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. ती वगळता महापालिकेकडून सुमारे ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत केले जाते. या ठिकाणी पाणीपुरवठा करणार्‍या आंध्र आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसर्‍या ठिकाणी केवळ ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचीही माहिती मिळाली.
महापालिका हद्दीत सुमारे ६५ हून अधिक जलकुंभांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी मीटर असल्याची माहिती विभागाकडून मिळाली. एकूण पाण्यापैकी सुमारे १५० एमएलडी पाणी उल्हास नदीच्या पात्रातून, ९०-९५ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसी देते. तर अन्य ७ दशलक्ष लिटर पाणी टिटवाळ्याच्या माध्यमातून मिळते. एमआयडीसी स्वत: पाणी शुद्ध करुन देते. तसेच उल्हास नदिचे पाणी व टिटवाळळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी बारवे जलशूद्धीकरण केंद्राचा वापर करण्यात येत असून त्या ठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. वितरणाचे आणखी काही नवीन जलकुंभ बांधले असून त्यातूनही पाणी वितरीत करण्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणी गळतीला चाप लावून त्या ठिकाणी आगामी काळात हजारो मीटर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
...............................................................................
कोट : जोपर्यंत रेनफॉल आहे तोपर्यंत पाणी कपात नाही, परंतू त्यानंतर मात्र इरिगेशन विभागाच्या सूचनांनुसार पाणी कपात करण्यात येणार - तरूण जुनेजा, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी