शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कळमेश्वर...

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा
वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष : बोरगाव (बुजुर्ग) व आदासा येथील ३०० हेक्टर जमीन अधिग्रहित
कळमेश्वर : कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांची ३०० हेक्टर जमीन शासनाने अधिग्रहित केली. परंतु या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नसून शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील एक वर्षांपासून रखडलेल्या या समस्येवर अद्यापही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने मोबदला द्यावा अथवा शेतजमीन विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
तालुक्यातील जमिनीखाली खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असून याकरिता तालुक्यातील बोरगाव (बुजुर्ग) परिसरात ३० वर्षांपूवी कोळसा खदान तयार करण्यात आली. या कोळसा खदानीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन करून वेकोलिने खनिज संपत्तीची उचल केली. परंतु या उत्खननामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने या परिसरातील विहिरी संपूर्ण कोरड्या पडल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत होता. यात कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांना सामोरे जात शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट बनत आहे. अशात काही शेतकऱ्यांनी घरची स्थिती लक्षात घेता शेती विकून आलेल्या पैशात कुटुंबाचा गाडा हाकण्याचे स्वप्न बाळगले. मात्र, वेकोलि प्रशासनाने या परिसरातील शेती पुन्हा अधिग्रहित केल्याने त्या शेतीच्या विक्री व्यवहारावर बंदी घातली. परिणामी शेतकऱ्यांपुढे कौटुंबिक कार्य पुढे चालविण्याचा नवा पेच निर्माण झाला आहे.
बोरगाव (बुजुर्ग) येथील १८०.०३ हेक्टर व आदासा येथील १२९.९३ हेक्टर शेतजमीन कोळसा क्षेत्र अर्जन अधिनियम १९५७ ची धारा ७ ची उपधारा १ द्वारा अधिग्रहित करण्यात आली आहे. या कारवाईला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. वेकोलि प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
एखाद्या शेतकऱ्याला मुलीच्या लग्नाकरिता किंवा इतर कामासाठी शेती विकायची असली तरीदेखील तो विक्री करू शकत नाही, तर दुसरीकडे वेकोलि प्रशासन मोबदला देत नाही, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडले आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींही लक्ष देण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)