शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

शंकरनारायणन यांच्या कारकिर्दीत आदिवासींना न्याय

By admin | Updated: August 25, 2014 03:46 IST

के. शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ४ वर्षे ७ महिन्यांची कारकिर्द कुठल्या एका कारणासाठी सदैव लक्षात राहील

मुंबई : के. शंकरनारायणन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ४ वर्षे ७ महिन्यांची कारकिर्द कुठल्या एका कारणासाठी सदैव लक्षात राहील, असे विचारले तर त्याचे उत्तर आहे त्यांनी आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार. या समस्या सोडविण्यास सर्व सूत्रेच जणू त्यांनी हातात घेत वेळोवेळी सरकारला निर्णय घ्यायला लावले. राजभवनातील वरिष्ठ अधिकारी सांगतात की आपल्या कारकिर्दीत राज्यपाल सर्वाधिक चिंतित असत ते गोरगरीब आदिवासींबद्दल. या चिंतेतूनच ते आदिवासी विकास मंत्री, या विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना अनेकदा राजभवनावर बोलवत आणि निर्देशही देत. आदिवासी विकासाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी झाली पाहिजे या बाबत त्यांचा कटाक्ष असे.केवळ राजभवनात बसून बोलण्यापेक्षा ते आदिवासी भागात अनेकदा गेले, आदिवासींशी त्यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ९ जून २०१४ रोजी त्यांनी आपल्या अधिकारात एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला. त्यानुसार, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवकाची आदिवासीबहुल जिल्ह्यातील पदे स्थानिक आदिवासींसाठी राखीव ठेवण्यास त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी मुलामुलींची तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे, असे आदेशच त्यांनी कुलपती या नात्यांनी विद्यापीठांना दिले. विदर्भ, मराठवाड्यांसह राज्याच्या मागास भागांना शासकीय निधीचे समन्यायी वाटप व्हावे आणि मागास भागांचा निधी इतरत्र वळविला जावू नये, हेही ते कटाक्षाने पाहत. असा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी सरकारच्या धूरिणांना समज देण्याचेही काम केले. (विशेष प्रतिनिधी)