शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

न्याययंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञान येणे आवश्यक

By admin | Updated: April 3, 2017 04:55 IST

कैद्यांना तुरुंगातून न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची जबानी नोंदविण्याचा विचार व्हायला हवा.

अलाहाबाद : न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळायला हवी आणि कैद्यांना तुरुंगातून न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची जबानी नोंदविण्याचा विचार व्हायला हवा. नवीन तंत्रज्ञान आणि कालबाह्य कायदे रद्द करणे यांमुळे न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की कायदे जितके अधिक आणि किचकट वा क्लिष्ट असतात, तितका न्यायव्यवस्थेवर ताण अधिक असतो. या समारंभात सरन्यायाधीश जे. एस. केहर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सरन्यायाधीश केहर यांनी न्यायाधीशांची कमतरता आणि प्रलंबित खटल्यांची वाढती संख्या याविषयी चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडून पंतप्रधानांनी क्लिष्ट व कालबाह्य कायदे रद्द करणे आणि न्याययंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे यांवर भर दिला. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. गरिबांनाही कायद्यामुळे त्यांचे हक्क मिळायला हवेत, असे सांगताना मोदी यांनी महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा उल्लेख केला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील वकिलांच्या योगदानाविषयीही ते बोलले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कायदा हा सर्वोच्च असतो. कायद्यापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही आणि कायदा हा शासकांचाही शासक असतो, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अनेक न्यायाधीश तसेच वकील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. > १२00 कायदे रद्द केलेआमच्या सरकारने कालबाह्य कायदे रद्द करण्याचे ठरविले आणि आतापर्यंत असे तब्बल १२00 कायदे रद्द केले असून, आणखीही बरेच कायदे टप्प्पाटप्प्याने संपुष्टात आणले जातील. न्यायालयात सरकारी दाव्यांची संख्या प्रचंड असून, ती कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.