शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

जोगींच्या पक्षामुळे चित्र पालटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 06:08 IST

जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली

रायपूर : छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा काळ असला तरी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली आहे. या राज्यात आजवर भाजप आणि काँग्रेसच्या द्विध्रुवीय राजकारणाचे प्राबल्य राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत जोगींच्या नव्या पक्षाचा कितपत प्रभाव दिसून येणार याचे भाकीत सध्याच्या स्थितीत वर्तवणे अशक्य आहे, मात्र जोगींनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दिल्ली ते रायपूर अशी खळबळ उडविली असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.दीर्घ काळपासून सत्तेच्या दूर राहूनही जोगी समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला जोगींना अटकाव घालण्यासाठी डावपेच आखणे भाग पडणार आहे. राज्याला सशक्त विरोधकाची गरज असताना प्रदेश काँग्रेसला रमणसिंग यांच्या सरकारवर दबाव आणण्यात अपयश आल्यामुळे मला नवा पक्ष स्थापन करणे क्रमप्राप्त ठरल्याचे जोगी यांनी स्पष्ट केले आहे.जोगींनी साथ सोडल्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या व्होट बँकेला हादरा बसेल. त्याचा फायदा भाजपला होईल. राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे भाजप चिंतेत पडली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल म्हणाले की, जोगींच्या नव्या पक्षामुळे काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आमच्या पक्षाला छत्तीसगडमधील सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यास मदतच होईल. याआधीच्या निवडणुकीत भाजपने जोगींची नकारात्मक प्रतिमा समोर आणत यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर जोगी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे पक्ष पुनरुज्जीवित होईल. (वृत्तसंस्था)>भाजपपुढे तिहेरी आव्हानभाजपला २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जोगींच्या पक्षाकडून आव्हानाला तोंड द्यावे लागेल. सतनामी अनुसूचित जातींसह ५० टक्के लोकसंख्येच्या आदिवासींवर जोगींची चांगली पकड असल्याने ते भाजपसोबतच काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात. जोगींनी अनुसूचित जातींची मते खेचल्यास भाजपला हादरा बसेल. भाजपने अनुसूचित जातींच्या दहापैकी नऊ जागा काबीज केल्या असतानाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जोगींमुळे धोका निर्माण होईल असे वाटत नाही. >मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या कुशासनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार समर्थकासारखी काम करीत आहे. या राज्याला भ्रष्ट सरकारपासून मुक्त करण्यासाठी मी नवा पक्ष स्थापण्याचा निर्णय घ्यावा, अशी इच्छा माझे समर्थक आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.-अजित जोगी, माजी मुख्यमंत्री.