शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जोगींच्या पक्षामुळे चित्र पालटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 06:08 IST

जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली

रायपूर : छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा काळ असला तरी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली आहे. या राज्यात आजवर भाजप आणि काँग्रेसच्या द्विध्रुवीय राजकारणाचे प्राबल्य राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत जोगींच्या नव्या पक्षाचा कितपत प्रभाव दिसून येणार याचे भाकीत सध्याच्या स्थितीत वर्तवणे अशक्य आहे, मात्र जोगींनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दिल्ली ते रायपूर अशी खळबळ उडविली असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.दीर्घ काळपासून सत्तेच्या दूर राहूनही जोगी समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला जोगींना अटकाव घालण्यासाठी डावपेच आखणे भाग पडणार आहे. राज्याला सशक्त विरोधकाची गरज असताना प्रदेश काँग्रेसला रमणसिंग यांच्या सरकारवर दबाव आणण्यात अपयश आल्यामुळे मला नवा पक्ष स्थापन करणे क्रमप्राप्त ठरल्याचे जोगी यांनी स्पष्ट केले आहे.जोगींनी साथ सोडल्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या व्होट बँकेला हादरा बसेल. त्याचा फायदा भाजपला होईल. राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे भाजप चिंतेत पडली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल म्हणाले की, जोगींच्या नव्या पक्षामुळे काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आमच्या पक्षाला छत्तीसगडमधील सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यास मदतच होईल. याआधीच्या निवडणुकीत भाजपने जोगींची नकारात्मक प्रतिमा समोर आणत यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर जोगी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे पक्ष पुनरुज्जीवित होईल. (वृत्तसंस्था)>भाजपपुढे तिहेरी आव्हानभाजपला २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जोगींच्या पक्षाकडून आव्हानाला तोंड द्यावे लागेल. सतनामी अनुसूचित जातींसह ५० टक्के लोकसंख्येच्या आदिवासींवर जोगींची चांगली पकड असल्याने ते भाजपसोबतच काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात. जोगींनी अनुसूचित जातींची मते खेचल्यास भाजपला हादरा बसेल. भाजपने अनुसूचित जातींच्या दहापैकी नऊ जागा काबीज केल्या असतानाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जोगींमुळे धोका निर्माण होईल असे वाटत नाही. >मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या कुशासनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार समर्थकासारखी काम करीत आहे. या राज्याला भ्रष्ट सरकारपासून मुक्त करण्यासाठी मी नवा पक्ष स्थापण्याचा निर्णय घ्यावा, अशी इच्छा माझे समर्थक आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.-अजित जोगी, माजी मुख्यमंत्री.