शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

जोगींच्या पक्षामुळे चित्र पालटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 06:08 IST

जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली

रायपूर : छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा काळ असला तरी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली आहे. या राज्यात आजवर भाजप आणि काँग्रेसच्या द्विध्रुवीय राजकारणाचे प्राबल्य राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत जोगींच्या नव्या पक्षाचा कितपत प्रभाव दिसून येणार याचे भाकीत सध्याच्या स्थितीत वर्तवणे अशक्य आहे, मात्र जोगींनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दिल्ली ते रायपूर अशी खळबळ उडविली असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.दीर्घ काळपासून सत्तेच्या दूर राहूनही जोगी समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला जोगींना अटकाव घालण्यासाठी डावपेच आखणे भाग पडणार आहे. राज्याला सशक्त विरोधकाची गरज असताना प्रदेश काँग्रेसला रमणसिंग यांच्या सरकारवर दबाव आणण्यात अपयश आल्यामुळे मला नवा पक्ष स्थापन करणे क्रमप्राप्त ठरल्याचे जोगी यांनी स्पष्ट केले आहे.जोगींनी साथ सोडल्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या व्होट बँकेला हादरा बसेल. त्याचा फायदा भाजपला होईल. राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे भाजप चिंतेत पडली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल म्हणाले की, जोगींच्या नव्या पक्षामुळे काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आमच्या पक्षाला छत्तीसगडमधील सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यास मदतच होईल. याआधीच्या निवडणुकीत भाजपने जोगींची नकारात्मक प्रतिमा समोर आणत यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर जोगी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे पक्ष पुनरुज्जीवित होईल. (वृत्तसंस्था)>भाजपपुढे तिहेरी आव्हानभाजपला २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जोगींच्या पक्षाकडून आव्हानाला तोंड द्यावे लागेल. सतनामी अनुसूचित जातींसह ५० टक्के लोकसंख्येच्या आदिवासींवर जोगींची चांगली पकड असल्याने ते भाजपसोबतच काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात. जोगींनी अनुसूचित जातींची मते खेचल्यास भाजपला हादरा बसेल. भाजपने अनुसूचित जातींच्या दहापैकी नऊ जागा काबीज केल्या असतानाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जोगींमुळे धोका निर्माण होईल असे वाटत नाही. >मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या कुशासनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार समर्थकासारखी काम करीत आहे. या राज्याला भ्रष्ट सरकारपासून मुक्त करण्यासाठी मी नवा पक्ष स्थापण्याचा निर्णय घ्यावा, अशी इच्छा माझे समर्थक आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.-अजित जोगी, माजी मुख्यमंत्री.