शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जोगी, कामत यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये भूकंप

By admin | Updated: June 8, 2016 02:58 IST

काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे. एकीकडे कामत यांच्याशी चर्चा सुरू असून दुसरीकडे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत असताना महत्त्वाचे नेते पक्षातून बाहेर का पडत आहेत यावर विचारमंथन सुरू आहे.दरम्यान छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेले अजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यावर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांची काँग्रेस कार्यकारिणीसोबत इतर पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे छत्तीसगडचे प्रभारी व्ही.के. हरिप्रसाद यांनी ही माहिती दिली. पक्षाचे महासचिव असलेले गुरुदास कामत यांच्याबाबत मात्र काँग्रेसने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कारण त्यांचे मन वळविण्यात येईल असा विश्वास पक्षाला आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उभय नेत्यांनी उपेक्षा सहन न झाल्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मेघालयातही गडबड याआधी झाली वा आता सुरू आहे. परिणामी राहुल गांधी यांनी बऱ्याच काळापासून प्रलंबित संघटनात्मक फेरबदलाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.पक्षाचे महासचिवही बदलले जाणार असून राहुल गांधी यांचे निकटस्थ मानले जाणारे राजू, जितीनप्रसाद, भँवर जीतेंद्र सिंग यांच्यासारख्या तरुण नेत्यांना नव्या चमूत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची तयारी सुरू आहे.