शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी कालवश

By admin | Updated: July 28, 2016 16:37 IST

प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 

 
कोलकाता, दि. २८ - प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 
 
कोलकात्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताने एक महान लेखक आणि बंगालने आई गमावली आहे. मी माझा व्यक्तीगत मार्गदर्शक गमावला असून, महाश्वेता देवींच्या आत्म्याला शांती लाभो असे टि्वट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. 
 
महाश्वेतादेवी लेखिका त्याच्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारताच्या वेगवेगळया समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. 
 
महाश्वेता देवीच्या कथेवर आधारीत मराठी चित्रपट 
महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सारंग साठ्ये, राजकुमार तांगडे, वीणा जामकर, कैलास वाघमारे, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार अशी तगडी कास्ट होती. या चित्रपटाची कथा कोरकू या मागासलेल्या जमातीवर बेतलेली होती. मेळघाटात राहाणाऱ्या या आदिवासी जमातीत कुपोषण ही मोठी समस्या आहे. ही जमात संपूर्ण जगापासून काहीशी दूर राहाण्याचाच प्रयत्न करते. आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वासच नाहीये. त्यामुळे आजारी पडल्यावर डॉक्टर, उपचार अशा काही गोष्टी असतात हे त्यांना पटतच नाही. याच त्यांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या एका डॉक्टरची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कुपोषण या गंभीर समस्येवर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक संदेश भंडारे यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता. 
 
या चित्रपटाची कथा ही महाश्वेतादेवी यांची असल्याने हा चित्रपट बनवण्यापूर्वी संदेश भंडारे महाश्वेतादेवी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव शब्दांत मांडणे खूपच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले होते. संदेश यांनी भेटल्यानंतर महाश्वेतादेवी यांना रॉयल्टीच्या रक्कमेबाबत विचारले होते. त्यावर त्यांनी त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक रुपयाची मागणी केली होती. त्यांनी मागितलेली ही रक्कम ऐकून मला धक्काच बसला होता असे संदेश यांनी सांगितले होते. तरीही इतक्या मोठ्या व्यक्तीला इतकीशी छोटी रक्कम कशी द्यायची असा विचार करून संदेश यांनी या चित्रपटासाठी 21000 रुपये इतके मानधन त्यांनी दिले होते. अमोल धोंडगे या अभिनेत्याने या चित्रपटात म्हादू ही प्रमुख भूमिका साकारली होती.