शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर १५ सप्टेंबरला जेलभरो; राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

By admin | Updated: September 8, 2015 15:42 IST

विरोधात असल्याचे भान ठेवा- भुजबळांच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या

विरोधात असल्याचे भान ठेवा- भुजबळांच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या
नाशिक : मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांसह जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही दुष्काळाची तीव्रता वाढली असून, सरकारला याबाबत उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी १५सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.८) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व तालुकाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी राज्यातील दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधात येत्या १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे, जळगाव, नंदुरबारच नव्हे तर नाशिक व अहमदनगर जिल्‘ांतही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नाशिकला येत्या १५ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल. यावेळी जिल्‘ातील सर्वच तालुकाध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही दिली. यावेळी बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी खासदार देवीदास पिंगळे, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सचिन पिंगळे, छबू नागरे, रायुकॉँ शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, रंजन ठाकरे, छबू नागरे, विनायक खैरे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, अलका जाधव, सुनील वाजे, संजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
इन्फो..
विरोधात असल्याचे भान ठेवा
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना कानपिचक्या देताना आपण आता विरोधात आहोत, याचे भान ठेवा. काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही अजूनही सत्तेत असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी जनसामान्यांच्या व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत, असे कुंभमेळ्याचे व दुष्काळाचे उदाहरण देऊन भुजबळांनी उपस्थितांचे कान टोचले.