शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
२६ पर्यटकांच्या हत्येचा बदला! सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी, ऑपरेशन महादेवला मिळालं यश
3
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
5
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
6
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
7
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
8
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
10
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
11
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
12
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
13
'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन 
14
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
15
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
16
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
17
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
18
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
19
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
20
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

नवी दिल्ली : वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक संकटे आणि अन्य विनाशकारी परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्थेने वैज्ञानिक पद्धतीने काम करायला हवे, असे मोदींनी वातावरण बदलासंबंधी पॅरिस येथे होणाऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी मन की बात कार्यक्रमात स्पष्ट केले.आज वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा सुरू आहे. चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक काम करण्यापूर्वी त्याला दर्जात्मक स्वीकृती मिळत आहे. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी व चिंता आहे. ऊर्जा संरक्षण हा तापमानवाढीपासून बचावाचा पहिला मार्ग आहे. आज जगाच्या काना-कोपऱ्यातून नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत असतात. झपाट्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा परिणाम दिसू लागला आहे. अलीकडेच तामिळनाडूत आणि अन्य काही राज्यांमध्ये मुसळधार पावसात मोठे नुकसान झाले आहे. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोकसंवदेना व्यक्त करतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)