शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

इशरत जहाँप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा - शत्रुघ्न सिन्हा

By admin | Updated: March 2, 2016 11:58 IST

२००४ साली अहमदाबादमध्ये झालेल्या इशरत जहाँ चकमकप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ - २००४ साली अहमदाबादमध्ये झालेल्या इशरत जहाँ चकमकप्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विवटरवरून शत्रुघ्न सिन्हा याप्रकरणी भाष्य करत पारदर्शकतेसाठी या प्रकरणाची पुन्हा तपासणी व्हावी असे म्हटले आहे. 
' प्रामाणिकपणा व पारदर्शकतेसाठी इशरत जहॉं प्रकरणाची पुनर्तपासणी व्हायला हवी. याप्रकरणी तत्कालिन "प्रभावी‘ (माजी) गृहमंत्री चिदंबरम व इतरावंर करण्यात आलेल्या आरोपांची सथोल तपासले पाहिजेत. आणि ज्यांचा या प्रकरणात सहभाग नाही, त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची ही संधी आहे' असे सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ' दूध का दूध और पानी का पानी होना जरूरी आहे' असेही त्यांनी नमूद केले आहे. 
 
दरम्यान इशरत जहाँ दहशतवदी असल्याचा व तिचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा उल्लेख गाळून, तयार करण्यात आलेल्या दुस-या प्रतिज्ञापत्रावर माझ्याकडून जबरदस्तीने सही करून घेण्यात आली होती असा गौप्यस्फोट गृहविभागाचे तत्कालिन अधिकारी आरव्हीएस मणी यांनी केला. त्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली, माझा छळ करून मला सिगारेटचे चटके देण्यात आले, असा आरोपही मणी यांनी केला. 
इशरत प्रकरणात दोन प्रतिज्ञापत्रे बनवण्यात आली होती. पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरतसह चार दहशतवादी चकमकीत ठार झाल्याचे आल्याचे म्हटले होते. मात्र, दोन महिन्यातच सरकारने घूमजाव करत प्रतिज्ञापत्र बदलले. मी मात्र पहिल्याच प्रतिज्ञापत्रावर ठाम होतो. दुस-या प्रतिज्ञापत्रावर मला जबरदस्तीने सही करावी लागली, असे मणी यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान या चकमकीशी संबंधित सर्व फाइल्स, शपथपत्रे आणि अन्य कागदपत्रे यांचा शोध घेण्यास गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे. याप्रकरणात इशरत दहशतवादी असल्याचा उल्लेख टाळायला लावणारे शपथपत्र दाखल करण्याप्रकरणी तत्कालिन गृहमंत्री व काँग्रेस नेते पी़ चिदंबरम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत़. तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही यात काही भूमिका होती का? याची छाननी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारख्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत.