शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे दादरीवर हेतुपुरस्सर मौन

By admin | Updated: November 4, 2015 04:27 IST

कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी

नवी दिल्ली : कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी भाष्य केले नाही. त्यांनी हेतुपुरस्सर मौन पाळल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि एकेकाळी मोदींचे खास समर्थक राहिलेल्या अरुण शौरी यांनी केला आहे.मोदी हे होमिओपॅथी विभागाचे गट अधिकारी किंवा विभागप्रमुख नसून देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाला नैतिक मार्ग दाखवून द्यावा, असे ते एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले. हिंसाचार आणि बीफ वादानंतर शौरींनी अलीकडे मोदींवर केलेला हा दुसरा थेट हल्ला आहे. शौरी यांनी भाजप सदस्यत्वाचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.रालोआ सरकार हे संपुआ सरकारची कॉपी असून सोबत गाय असलेली काँग्रेस आहे. बिहारमधील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि पक्षनेत्यांनी हा मुद्दा धगधगत ठेवला असताना दादरीसारख्या घटनांबद्दल मोदींनी मुद्दाम मौन पाळले आहे. यापूर्वी शौरींनी केलेल्या टीकेला महत्त्व देण्याचे टाळत भाजपने शौरी हे मंत्री बनू न शकल्याने दु:ख व्यक्त करीत आहेत, असा टोला मारला होता. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये एका समुदायाला दुसऱ्याविरुद्ध भडकावण्याचे काम चालविले आहे. पाकिस्तान खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना भारत हळूहळू त्या खड्ड्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींना २००२ च्या गुजरात दंगलींपासून वैचारिक असहिष्णुतेची सर्वात मोठी झळ पोहोचली आहे. तेच मोठे पीडित ठरले आहेत, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे सर्वात वाईट बचाव होय. मोदींच्या सूडबुद्धीचेच ते योग्य समर्थन ठरेल. विचारवंत हे विवेक बाळगणारे असतात. त्यांच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ नये, असे ते म्हणाले. मोदी तर सर्वसमावेशकपंतप्रधान मोदी हे असहिष्णू नव्हे, तर सर्वसमावेशक असे नेते आहेत, असे स्पष्ट करीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी भक्कम बचाव केला आहे. मोदी ७ नोव्हेंबर रोजी काश्मीर भेटीवर येत असून त्यावेळी ते पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याला अनुकूलता दर्शवतील. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये काश्मीरच्या भूमीवरूनच पाकिस्तानसोबतच्या चर्चेची कोंडी फोडली होती, याचे स्मरणही त्यांनी करवून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)