शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

मोदींचे दादरीवर हेतुपुरस्सर मौन

By admin | Updated: November 4, 2015 04:27 IST

कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी

नवी दिल्ली : कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी भाष्य केले नाही. त्यांनी हेतुपुरस्सर मौन पाळल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि एकेकाळी मोदींचे खास समर्थक राहिलेल्या अरुण शौरी यांनी केला आहे.मोदी हे होमिओपॅथी विभागाचे गट अधिकारी किंवा विभागप्रमुख नसून देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाला नैतिक मार्ग दाखवून द्यावा, असे ते एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले. हिंसाचार आणि बीफ वादानंतर शौरींनी अलीकडे मोदींवर केलेला हा दुसरा थेट हल्ला आहे. शौरी यांनी भाजप सदस्यत्वाचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.रालोआ सरकार हे संपुआ सरकारची कॉपी असून सोबत गाय असलेली काँग्रेस आहे. बिहारमधील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि पक्षनेत्यांनी हा मुद्दा धगधगत ठेवला असताना दादरीसारख्या घटनांबद्दल मोदींनी मुद्दाम मौन पाळले आहे. यापूर्वी शौरींनी केलेल्या टीकेला महत्त्व देण्याचे टाळत भाजपने शौरी हे मंत्री बनू न शकल्याने दु:ख व्यक्त करीत आहेत, असा टोला मारला होता. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये एका समुदायाला दुसऱ्याविरुद्ध भडकावण्याचे काम चालविले आहे. पाकिस्तान खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना भारत हळूहळू त्या खड्ड्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींना २००२ च्या गुजरात दंगलींपासून वैचारिक असहिष्णुतेची सर्वात मोठी झळ पोहोचली आहे. तेच मोठे पीडित ठरले आहेत, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे सर्वात वाईट बचाव होय. मोदींच्या सूडबुद्धीचेच ते योग्य समर्थन ठरेल. विचारवंत हे विवेक बाळगणारे असतात. त्यांच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ नये, असे ते म्हणाले. मोदी तर सर्वसमावेशकपंतप्रधान मोदी हे असहिष्णू नव्हे, तर सर्वसमावेशक असे नेते आहेत, असे स्पष्ट करीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी भक्कम बचाव केला आहे. मोदी ७ नोव्हेंबर रोजी काश्मीर भेटीवर येत असून त्यावेळी ते पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याला अनुकूलता दर्शवतील. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये काश्मीरच्या भूमीवरूनच पाकिस्तानसोबतच्या चर्चेची कोंडी फोडली होती, याचे स्मरणही त्यांनी करवून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)