शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्वयंपूर्णतेसाठी स्वदेशी संरक्षण उत्पादन गरजेचे

By admin | Updated: January 4, 2016 02:55 IST

संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतास स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतास स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. देशातील शास्त्रज्ञ व अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्वदेशी संरक्षण उत्पादनास चालना देत असल्याचेही त्यांनी सांगितले.कर्नाटकच्या तुमाकुरू जिल्ह्यातील बीदरहल्ला कवान येथे ५,००० कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड हेलिकॉप्टर प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सशस्त्र दल देशासाठी कुठलेही बलिदान देण्यास तयार आहे. डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना जगातील सर्वश्रेष्ठ व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची गरज आहे. आता आपण आपल्या जवानांसाठी विदेशातून शस्त्रास्त्रे आयात करतो. भारत यावर कोट्यवधी रुपये खर्च करतो. याउपरही अपेक्षित अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला मिळत नाही. ही स्थिती बदलायची असेल तर भारतालाच या क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे लागेल, असे ते म्हणाले.केंद्र व राज्यांच्या संस्थांमध्ये शास्त्रीय समन्वय वाढविण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरू आहे. माझ्या व माझ्या सरकारसाठी सुशासनाचा अर्थ केवळ धोरण वा निर्णय घेणे आणि त्यात पारदर्शकता वा उत्तरदायित्व आणणे, एवढाच नाही, तर आमच्या ध्येयधोरणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सामील करणे हाही आहे, असे सांगत शहरांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी तुम्हाला अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे बनवावी लागतील. शहरांच्या विकासासोबतच अनेक आव्हानेही निर्माण झाली आहेत. अशा स्थितीत तुमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. केवळ हवामान बदलाच्या समस्येशी लढणेच नाही, तर या हवामान बदलासोबत न्याय करण्याचीही गरज आहे. निसर्ग आणि परिसंस्थेची काळजी घेत, आपल्याला अधिक संवेदनशीलपणे योजना बनवून अत्याधुनिक शास्त्रीय मार्गाने शहरांचा विकास साधायचा आहे, असे शास्त्रज्ञ व संशोधकांना उद्देशून ते म्हणाले.