शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

निकृष्ट दर्जामुळे भारतीय सैनिक विकत घेतात बूट नी गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 13:12 IST

भारतीय सैनिकांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवण्यात येत असल्यामुळे सैनिक स्वत:चे बूट व गणवेश स्वत:च्या पैशातून खरेदी करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - भारतीय सैनिकांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवण्यात येत असल्यामुळे सैनिक स्वत:चे बूट व गणवेश स्वत:च्या पैशातून खरेदी करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड बूट व युनिफॉर्मच्या उत्पादनासाठी जबाबदार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गणवेशाच्या दर्जाबाबत प्रचंड तक्रारी आहेत, ते एकतर लगेच उसवतात आणि त्यांचा रंगही लवकर उडतो. त्यामुळे सैनिकांचे गणवेश एकसारखे दिसत नाहीत. त्याखेरीज गणवेशाची मापं हादेखील तक्रारीचा भाग आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या अधिका-यांनी या तक्रारींची दखल घेत चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.
 
 
सैनिकांना दर १८ महिन्यांनी नवे बूट देण्यात येतात, परंतु ते तीन ते चार महिन्यांच्यावर टिकत नाहीत अशी तक्रार आहे. त्यामुळे बाजारातून दुसरे बूट विकत घेण्याखेरीज काही पर्याय नसतो अशी व्यथा एकाने व्यक्त केली आहे. 
संरक्षण खात्याच्या मुख्यालयाने उत्पादनांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केल्याचेही इकॉनॉमिक टाइम्सने नमूद केले आहे. जवळपास १२ लाखाच्या घरात संख्या असलेल्या भारतीय सैन्यातील जवानांवर बूट व गणवेश निकृष्ट दर्जामुळे स्वत:च खरेदी करण्याची वेळ येत असेल तर ती खेदाची बाब म्हणावी लागेल.