शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

भारत सहिष्णुतेच्या पायावर उभा -दलाई लामा

By admin | Updated: November 16, 2015 00:17 IST

भारतातील लोकांचा अद्यापही शांतता आणि बंधुतेवर विश्वास आहे. ताज्या बिहार विधानसभा निवडणुकीने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे मत तिबेटचे श्रद्धास्थान असलेले दलाई लामा यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतातील लोकांचा अद्यापही शांतता आणि बंधुतेवर विश्वास आहे. ताज्या बिहार विधानसभा निवडणुकीने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे मत तिबेटचे श्रद्धास्थान असलेले दलाई लामा यांनी व्यक्त केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून रान पेटले असतानाच दलाई लामांनी हे वक्तव्य केल्याने भाजपच्या भुवया उंचावल्या. याउलट काँग्रेस व जदयूने लामांच्या उपरोक्त वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.शनिवारी जालंधरस्थित लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पाचव्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी बोलताना लामांनी बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. काही समस्या असू शकतात; पण भारत धर्मनिरपेक्षता व सहिष्णुतेच्या पायावर उभा आहे. बहुसंख्य हिंदूंना शांतता व सौहार्द प्रिय आहे. बिहारातील ताज्या निवडणूक निकालांनी हे सिद्ध केले आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले.रविवारी काँग्रेस व जदयू या पक्षांनी लामांच्या या वक्तव्याची पाठराखण केली. लामांनी सद्य:स्थितीत एकदम योग्य टिप्पणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद म्हणाले. जदयू सरचिटणीस के.सी. त्यागी यांनीही लामांच्या वक्तव्याचे स्वागत केले. लामांचे वक्तव्य हे देशात असहिष्णुतेला वाव देणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे, असे ते म्हणाले. याउलट लामांच्या वक्तव्यावर भाजपचा तिळपापड झालेला दिसला. दलाई लामा एक धार्मिक गुरू आहेत. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क