शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भारताने फेटाळला अमेरिकेचा भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव

By admin | Updated: April 4, 2017 22:33 IST

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ४ - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. दहशतवादी कारवाया, सर्जिकल स्ट्राइक, नियंत्रण रेषेवरील गोळीबार यामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावपूर्ण वातावरण आहे.  हे वातावरण निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्ताव अमेरिकेने दिला होता. स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रिया सुरू होण्यासाठी मध्यस्थी करण्यात उत्सुकता दाखवली होती. 
 पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. पाकिस्तानसोबतची विविध मुद्यांवरील द्विपक्षीय चर्चा दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात व्हावी अशी भारताची भूमिका आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप न करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. आता मात्र त्यात बदल होत असल्याचे अमेरिकेच्या या कृतीमधून दिसत आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निकी हेली यांनी सांगितले की, अमेरिका भार आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे चिंतीत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रियेत सहभागी होऊन हा प्रश्न सोडवण्यास इच्छुक आहेत,  
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्नामध्ये तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताने नेहमीच विरोध केला आहे. तसेच अमेरिका आणि रशियासह जगातील बहुतांश देशांनी भारताची ही भूमिका मान्य केली आहे.