शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारत तिस-या क्रमांकावर - यूएस रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 08:51 IST

2016 मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणा-या देशांच्या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - 2016 मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणा-या देशांच्या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. युएस स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मरणा-यांची आणि जखमींची संख्या पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त आहे. 
युएस स्टेट डिपार्टमेंटद्वारे NCSTRT संस्थेने केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत सर्वेक्षणानुसार सांगण्यात येते की, जगभरात इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतात झाले आहेत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारत दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत तिस-या स्थानावर आहे. याआधी तिस-या स्थानावर पाकिस्तानचा नंबर होता.  
NCSTRT संस्थेने माहितीनुसार, 2016 मध्ये जगभरात जवळपास 11 हजार 72 दहशतवादी हल्ले घडविण्यात आले. यामध्ये भारतात 927 (16 टक्के) दहशतवादी हल्ले झाले. तर, 2015 मध्ये भारतात हीच संख्या 798 होती. त्यावेळी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 500 च्या आसपास होती. तर 2016 मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या 636 इतकी झाली. दुसरीकडे, या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. पाकिस्तानमध्ये 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये दहशतवादी हल्ले 27 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 2015 मध्ये पाकिस्तानमध्ये 1010 दहशतवादी हल्ले झाले होते, तर 2016 मध्ये 734 हल्ले झाल्याची नोंद आहे. 
विशेष म्हणजे, या सर्वेक्षणामध्ये जगभरातील सर्वाधिक घातक तिस-या क्रमांकाची संघटना म्हणून नक्षलवाद्यांना घोषित करण्यात आले आहे. तर, पहिल्या नंबरवर इसिस ही दहशतवादी संघटना असून दुस-या स्थानावर तालिबान संघटना आहे. नक्षलवाद्यांना बोको हराम या दहशतवादी संघटनेपेक्षा जास्त उपसंहारक असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या 334 दहशतवादी हल्ल्यांमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात होते.
2016 मध्ये भारतात जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणीपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत. 
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 93 टक्कांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 54.81 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.