शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आळशी लोकांच्या यादीत भारत ३९वा!

By admin | Updated: July 15, 2017 00:22 IST

जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त ४२९७ पावले चालतात, असे या सर्व्हेतून आढळून आले आहे. स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला असून, त्यात जगतील ४६ देशांमधील तब्बल लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेले रोज किती चालतात, याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काउंटर्स अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आले होते. सर्व्हेच्या निष्कर्षानुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यातही हाँगकाँगमधील लोक अधिक उत्साही असून, ते दिवसाला किमान ६८८0 पावले चालतात.इंडोनेशिया हा देश मात्र सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान ३,५१३ पावले चालणे आवश्यक मानले जाते. मात्र, इंडोनेशियातील लोक त्याच्या निम्मीही पावले चालत नाहीत, असे हा सर्व्हे सांगतो.जगभरातील सरासरी आकडा ४,९६१ पावलं आहे. अमेरिकन लोक दिवसाला ४,७७४ पावले चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावले असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला जेमतेम ३९00 पावलेच चालतात. सर्व्हेतील मिळालेल्या माहितीनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय कमी चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान ३,६८४ तर पुरुष ४,६0८ पावले चालतात, असे हा सर्व्हे सांगतो. अधिकाधिक चालल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण कमी होते. मात्र महिलांनी आपले चालणे बंद वा कमी केल्यास चालणं बंद केल्यास त्यांचा लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण २३२ टक्के, तर पुरुषांच्या बाबतीत ६७ टक्के आहे.