शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

By admin | Updated: September 27, 2016 20:56 IST

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्ताननेच केला असल्याचे पुरावे आज भारताने पाकिस्तानकडे सुपूर्त केले आहेत. या हल्ल्यामुळे देशभर दु:खाची छाया आणि आक्रोशाचे वातावरण आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ सप्टेंबररोजी जयशंकर यांनी बासीत यांना समन्स बजावत दहशतवाद्यांकडे आढळलेल्या जीपीएस प्रणाली, कपडे, शस्त्रास्त्र यांची माहिती दिली होती. भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अब्दुल बासीत यांना उरी हल्ल्यातील काही पुरावेदेखील देण्यात आले असून या पुराव्यांमधून दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आल्याचे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणा-या दोघा जणांची नावही पाकिस्तानला देण्यात आली आहेत.दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोन तरुणांची नाव पाकिस्तानला देण्यात आली. फैझल हुसैन (२०) आणि यासीन खुर्शीद (१९) अशी या दोघांची नाव आहेत. तसेच उरीत हल्ला करणा-या एका दहशतावाद्याची ओळख पटली असून हाफीज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तोदेखील पाकव्याप्त काश्मीर निवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती बासीत यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.