शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

By admin | Updated: September 27, 2016 20:56 IST

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्ताननेच केला असल्याचे पुरावे आज भारताने पाकिस्तानकडे सुपूर्त केले आहेत. या हल्ल्यामुळे देशभर दु:खाची छाया आणि आक्रोशाचे वातावरण आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ सप्टेंबररोजी जयशंकर यांनी बासीत यांना समन्स बजावत दहशतवाद्यांकडे आढळलेल्या जीपीएस प्रणाली, कपडे, शस्त्रास्त्र यांची माहिती दिली होती. भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अब्दुल बासीत यांना उरी हल्ल्यातील काही पुरावेदेखील देण्यात आले असून या पुराव्यांमधून दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आल्याचे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणा-या दोघा जणांची नावही पाकिस्तानला देण्यात आली आहेत.दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोन तरुणांची नाव पाकिस्तानला देण्यात आली. फैझल हुसैन (२०) आणि यासीन खुर्शीद (१९) अशी या दोघांची नाव आहेत. तसेच उरीत हल्ला करणा-या एका दहशतावाद्याची ओळख पटली असून हाफीज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तोदेखील पाकव्याप्त काश्मीर निवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती बासीत यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.