शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

By admin | Updated: July 20, 2016 12:15 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तान एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती. 13 जूनला हल्ल्याची सर्व तयारी पुर्ण झाली होती. भारतीय हवाई दल संपुर्ण ताकदीनिशी पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या एअरबेसवर हल्ला करणार होतं. मात्र हल्ला करण्याची सूचना न मिळाल्याने ही योजना रद्द करावी लागली.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सर्व ठिकाणं भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होती. 16 विमानं पुर्ण तयार ठेवण्यात आली होती. हल्ला करण्याचा मार्गही तयार होता. सर्व वैमानिकांना खासगी रिव्हॉल्वर लोड करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. वैमानिकांजवळ पाकिस्तानी चलनाचीदेखील व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. जेणेकरुन आपातकालीन परिस्थितीत विमानातून उतरावं लागलं तर त्यांना सुरक्षित निघता यावं. 
 
जर भारताकडून हा हल्ला झाला असता तर दोन्ही देशांत खुप मोठं युद्ध पेटलं असत. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे दोन्ही देशाचे तत्कालीन पररारष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि सरतात अझीज यांच्यामधील संवादप्रक्रिया बंद झाली होती. यानंतरच भारतीय हवाई दलाने ही योजना आखली होती. युद्ध थांबवायचं असेल तर कारगीलमधी पाकिस्तानी घुसखोरांना हटवण्यात यावं, तसंच कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत 6 जवानांचे हाल करणा-यांना शिक्षा दिली जावी असा स्पष्ट संदेश सरतात अझीज यांना देण्यात आला होता. 
 
भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्ये याची नोंददेखील आहे. संवादप्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर 12 जूनला सरताज अझीज माघारी गेले होते. 13 जूनला हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. हवाई दलाच्या 17 स्क्वॉड्रन  डायरीत याची नोंद आहे. 1971 नंतप प्रथमच भारतीय हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करणार होतं. सकाळी 4.30 वाजेपर्यंत सर्वजण तयारीत होती. पण कोणतीच सूचना आली नाही. 12.30 वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली, मात्र सूचना न आल्याने हल्ल्याची योजना रद्द करण्यात आली.