शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

By admin | Updated: July 20, 2016 12:15 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तान एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती. 13 जूनला हल्ल्याची सर्व तयारी पुर्ण झाली होती. भारतीय हवाई दल संपुर्ण ताकदीनिशी पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या एअरबेसवर हल्ला करणार होतं. मात्र हल्ला करण्याची सूचना न मिळाल्याने ही योजना रद्द करावी लागली.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सर्व ठिकाणं भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होती. 16 विमानं पुर्ण तयार ठेवण्यात आली होती. हल्ला करण्याचा मार्गही तयार होता. सर्व वैमानिकांना खासगी रिव्हॉल्वर लोड करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. वैमानिकांजवळ पाकिस्तानी चलनाचीदेखील व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. जेणेकरुन आपातकालीन परिस्थितीत विमानातून उतरावं लागलं तर त्यांना सुरक्षित निघता यावं. 
 
जर भारताकडून हा हल्ला झाला असता तर दोन्ही देशांत खुप मोठं युद्ध पेटलं असत. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे दोन्ही देशाचे तत्कालीन पररारष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि सरतात अझीज यांच्यामधील संवादप्रक्रिया बंद झाली होती. यानंतरच भारतीय हवाई दलाने ही योजना आखली होती. युद्ध थांबवायचं असेल तर कारगीलमधी पाकिस्तानी घुसखोरांना हटवण्यात यावं, तसंच कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत 6 जवानांचे हाल करणा-यांना शिक्षा दिली जावी असा स्पष्ट संदेश सरतात अझीज यांना देण्यात आला होता. 
 
भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्ये याची नोंददेखील आहे. संवादप्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर 12 जूनला सरताज अझीज माघारी गेले होते. 13 जूनला हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. हवाई दलाच्या 17 स्क्वॉड्रन  डायरीत याची नोंद आहे. 1971 नंतप प्रथमच भारतीय हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करणार होतं. सकाळी 4.30 वाजेपर्यंत सर्वजण तयारीत होती. पण कोणतीच सूचना आली नाही. 12.30 वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली, मात्र सूचना न आल्याने हल्ल्याची योजना रद्द करण्यात आली.