शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कामगार संघटनांचा ‘भारत बंद’ संमिश्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:14 IST

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. डाव्या पक्षांची सत्ता असलेल्या केरळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ओडिशासारख्या काही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. हिंदी पट्ट्यातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी व दक्षिण भारतातील राज्यांमध्ये बंदचा अगदी नगण्य परिणाम जाणवला. पंजाब, हरयाणामध्ये वाहतूकदारही भारत बंदमध्ये उतरले होते.वाढती महागाई, सार्वजनिक उपक्रमांमध्ये होत असलेली निर्गुंतवणूक, रेल्वे, संरक्षण क्षेत्र, कोळसा उत्पादन, पशुसंवर्धन, सुरक्षा सेवा, औषधनिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस दिलेली परवानगी, कामगारविषयक ४४ कायद्यांमध्ये होणारे बदल या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा भारत बंद पुकारण्यात आल्याचे आयटकच्या सरचिटणीस अमरजित कौर यांनी सांगितले. प्रत्येकाला किमान ६ हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत द्यावी, अशाही या कामगार संघटनांच्या मागण्या होत्या. भारत बंदमध्ये पंजाब, हरयाणातील शेतकरीही सहभागी झाले होते. मात्र, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. या राज्यातील बस व अन्य वाहतूक सेवा सुरळीत होत्या, तसेच दुकाने व व्यापारी आस्थापनेही खुली होती. शाळा, महाविद्यालयेही सुरू होती. तेलंगणामध्ये बँकसेवेवर परिणाम झाला असला तरी वाहतूक सेवा व तसेच लोकांचे दैनंदिन व्यवहार व्यवस्थित सुरू होते.केरळमध्ये सत्ताधारी माकपप्रणीत डाव्या पक्षांच्या आघाडीच्याच कामगार संघटनांनी भारत बंद पुकारला असल्याने त्या राज्यातील बहुतांश कर्मचारी त्यात सहभागी झाले. त्यामुळे केरळमधील शासकीय तसेच खासगी कार्यालयातही नाममात्र उपस्थिती होती. मात्र, शबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणाºया बससेवेला या संपातून वगळण्यात आले होते. रस्त्यावर वाहने उतरली नसल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. मात्र, या राज्यातील रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती. राजस्थानमध्ये भारत बंदला संमिश्र, तर उत्तर प्रदेशमध्ये अगदी नगण्य प्रतिसाद मिळाला. या दोन्ही राज्यांत वाहतूक सेवेत कोणतेही अडथळे आले नाहीत तसेच दुकाने, व्यापारी आस्थापने खुली होती. त्रिपुरामध्ये सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये रोजच्याप्रमाणेच बुधवारीही कामकाज सुरू होते.>राजकीय अस्तित्व न उरलेल्यांचे आंदोलन : ममता बॅनर्जीपश्चिम बंगालमध्ये भारत बंदमुळे तेथील लोकल ट्रेनच्या १७० फेºया रद्द कराव्या लागल्या. राज्यात राजकीय अस्तित्व न उरलेल्यांनी भारत बंदची हाक दिली आहे, असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डावे पक्ष व काँग्रेसला लगावला आहे. हावडासह काही ठिकाणी निदर्शकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ओदिशामध्ये बंदमुळे रेल्वे, बससेवेवर परिणाम होऊन जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बालासोर, कटक, भुवनेश्वर येथे रेल व रास्ता रोको आंदोलन केले.