शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते - अमित शहा

By admin | Updated: May 26, 2015 14:09 IST

भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे. तर अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे अशा महत्त्वाच्या विषयांसाठी लोकसभेत भाजपाचे ३७० खासदार असणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.  

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीतील भाजपा कार्यालयात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भाबाबत प्रश्न विचारला असता आम्ही निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत अमित शहांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. अमित शहांच्या या विधानाने राज्यातील भाजपा नेते विशेषत: नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना - भाजपामध्ये नेहमीच वाद झाला असून भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उघडपणे स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.  

अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे हे भाजपाचे महत्त्वाचे विषय असून त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाची सध्याची भूमिका काय असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर अमित शहा म्हणाले, अशा विषयांवर तोडगा काढण्यासाठी लोकसभेत पक्षाचे ३७० खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन आता जुमला होती की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहेत.