शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

राज्यसभेत बढत पण बहुमतापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 07:08 IST

द्विवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) विरोधक संयुक्त पुरोगामी आघाडीवर (संपुआ) बढत प्राप्त झाली

नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) विरोधक संयुक्त पुरोगामी आघाडीवर (संपुआ) बढत प्राप्त झाली असली तरीही महत्त्वाची विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत तिच्याकडे नाही. यासाठी रालोआला प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावे लागेल.वरिष्ठ सभागृहात प्रादेशिक पक्षांचे ८९ सदस्य झाले आहेत. निवडणुकीनंतर त्यांच्या संख्येत कुठलाही बदल झालेला नाही. चार जागांच्या फायद्यासह समाजवादी पार्टी आता १९ सदस्यांवर पोहोचली आहे, तर संयुक्त जनता दल (जदयू) आणि राष्ट्रीय जनता दलाची (राजद) एकूण सदस्य संख्या १२ झाली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुकचे प्रत्येकी १२ सदस्य आहेत. तसेच बसपाचे सहा, माकपाचे आठ, बीजदचे सात आणि द्रमुकचे पाच सदस्य आहेत. निवडणुकीनंतर २४५ सदस्यीय राज्यसभेत रालोआची सदस्यसंख्या पाचने वाढून ७४ झाली आहे तर काँग्रेसप्रणीत संपुआचे तीन सदस्य कमी झाले असून एकूण ७१ सदस्य आहेत. ३ जूनला वरिष्ठ सभागृहात ३० उमेदवार अविरोध निवडून आले. रालोआने आपल्या एकूण सदस्यांमध्ये आणखी ११ सदस्यांची भर घातली असून त्यात भाजपाच्या खात्यात सात, तेदेपा दोन तसेच शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. उत्तर प्रदेशातील ११ जागांपैकी सात सपाच्या खात्यात गेल्या तर बसपाने दोन, भाजपा व काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>संपुआचे पाच सदस्य बिनविरोधसंपुआच्या फक्त पाच सदस्यांची अविरोध निवड झाली असून, यामध्ये काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य आहे. इतर पक्षांमध्ये जदयू दोन, राजद दोन, अण्णा द्रमुक चार, द्रमुक दोन आणि बीजदचे तीन सदस्य अविरोध राज्यसभेवर पोहोचले आहेत. शनिवारी २७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला १२ जागा मिळाल्या. पक्षाचे हरियाणात दोन, उत्तर प्रदेशात एक, मध्य प्रदेशात दोन, राजस्थानात चार, कर्नाटकात एक आणि झारखंडमध्ये दोन उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला सहा जागा मिळाल्या असून, त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक आणि कर्नाटकातील तीन जागांचा समावेश आहे.