शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडण्याबद्दल सुचवले होते - आमिर खान

By admin | Updated: November 24, 2015 09:26 IST

देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते, असे सांगत आमिर खानने प्रथमच या मुद्यावर मौन सोडले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि,. २४ - देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात आवाज उठवणा-या अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत आता अभिनेता आमिर खानचाही समावेश झाला असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने नमूद केले. सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिरने प्रथमच या विषयावर आपले मौन सोडले. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी प्रतिभावंत मंडळींसाठी पुरस्कारवापसी हा एक मार्ग असू शकतो, अशा शब्दांत आमिरने त्यांना पाठिंबा दर्शवला.
' या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात धएशातील असुरक्षितता, भय वाढले आहे' असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभो7वतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला. 
यावेळी त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला. आपवी काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी, नेत्यांनी खंबीरपणे पावले उचलणे, कायदा हातात घेणा-याविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळेच असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे सांगत त्याने राजकारण्यांवर टीका केली. 
दरम्यान या विधानानंतर आमिरवर चहुबाजूंनी टीका होत अाहे. आमिरचे हे वक्तव्य अतिशय दु:खद असून त्याने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे. तसेच आमिरला जर भारतात भीती  वाटत असेल तर त्याला जिथे शांती मिळेल, अशा ठिकाणी जाण्यास तो स्वतंत्र असल्याचेही ते म्हणाले.