शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.
जैन हिल्सवर आयोजित डाळिंब परिषदेत सुपे यांनी तांत्रिक सत्रात डाळिंबाचे खत व्यवस्थापन व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले.

दिवसाआड फवारणीची गरज नाही...
डाळिंब पिकावरील खर्च कमी व्हायला हवा. उत्पादक दिवसाआड फवारणी करतात. अनावश्यकपणे खते देतात. आपली जमीन कशी आहे याचा विचार करायला हवा. या अनावश्यक प्रकारामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असेही सुपे म्हणाले.
डाळिंब मूळचे इराणचे फळ
डाळिंब इराणचे फळ आहे. चीन, रशिया, मध्य आशिया असा प्रवास करीत हे फळ भारतात हिमाचल प्रदेशात आले. तेथून हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागात ते आले, अशी माहिती सुपे यांनी दिली.

तीन ते आठ टक्के चुनखडी नसली तरी चालेल...
डाळिंबाचे पीक ज्या जमिनीचा सामू ६.०, क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन मीटर आणि चुनखडी तीन ते आठ टक्के आहे, अशा जमिनीत चांगले येते, असा निष्कर्ष आहे. परंतु २० ते २२ टक्के चुनखडी असलेल्या जमिनीतही योग्य पाणी व खत व्यवस्थापनाने डाळिंब घेता येईल, असा दावा सुपे यांनी केला.

सात बाय सात फूटांवरील लागवडीचा धोका
डाळिंबाची लागवड सात बाय सात फूटांवर केली तर धोके वाढतात. १० बाय १५ फूट या अंतरात त्याची लागवड करणे योग्य आहे. यापेक्षा कमी अंतरात लागवड केली तर आर्द्रता वाढणे, हवा खेळती न राहणे, अशा समस्या निर्माण होतात आणि रोगराई वाढते. तेल्या रोग, अशा बागांमध्ये फोफावू शकतो, असे मतही सुपे यांनी व्यक्त केले.

सेंद्रीय मल्चींगमध्ये गव्हाचे कूट नको
बागेत सेंद्रीय मल्चींग (आच्छादन) करणे योग्य असते. पण गव्हाचे कूट टाकणे योग्य नाही. काड्या, पाला, पाचोळा, सोयाबीनच्या काढणीनंतर येणारा भुसा, गवत आदींचा वापर करता येईल. सेंद्रीय मल्चींग अतिशय लाभदायी असते, असेही सुपे यांनी सांगितले.
छाटणीची गरज नाही
पूर्वीच्या काळात डाळिंबाच्या बागांमध्ये छाटणीची गरज नसायची, पण अलीकडे छाटणीशिवाय बागच घेतली जात नाही. २५ रुपये प्रतिझाड, अशी मजुरी त्यासाठी वाया घालविली जाते. अशास्त्रीय पद्धतीने छाटणी केली जाते. शिवाय छाटणीनंतर लागलीच पाणी दिले जाते. पण त्यानंतर बागेला १० दिवस पाणी द्यायला नको. हलकी छाटणी करायला हवी, असेही सुपे म्हणाले.
फड पद्धतीने पाणी देऊ नये
डाळिंब बागेला फड पद्धतीने पाणी देऊ नये. ड्रीप वापरावे. तसेच खते व पाणी देण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून घ्यावे, असे सुपे यांनी सांगितले.