शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.
जैन हिल्सवर आयोजित डाळिंब परिषदेत सुपे यांनी तांत्रिक सत्रात डाळिंबाचे खत व्यवस्थापन व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले.

दिवसाआड फवारणीची गरज नाही...
डाळिंब पिकावरील खर्च कमी व्हायला हवा. उत्पादक दिवसाआड फवारणी करतात. अनावश्यकपणे खते देतात. आपली जमीन कशी आहे याचा विचार करायला हवा. या अनावश्यक प्रकारामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असेही सुपे म्हणाले.
डाळिंब मूळचे इराणचे फळ
डाळिंब इराणचे फळ आहे. चीन, रशिया, मध्य आशिया असा प्रवास करीत हे फळ भारतात हिमाचल प्रदेशात आले. तेथून हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागात ते आले, अशी माहिती सुपे यांनी दिली.

तीन ते आठ टक्के चुनखडी नसली तरी चालेल...
डाळिंबाचे पीक ज्या जमिनीचा सामू ६.०, क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन मीटर आणि चुनखडी तीन ते आठ टक्के आहे, अशा जमिनीत चांगले येते, असा निष्कर्ष आहे. परंतु २० ते २२ टक्के चुनखडी असलेल्या जमिनीतही योग्य पाणी व खत व्यवस्थापनाने डाळिंब घेता येईल, असा दावा सुपे यांनी केला.

सात बाय सात फूटांवरील लागवडीचा धोका
डाळिंबाची लागवड सात बाय सात फूटांवर केली तर धोके वाढतात. १० बाय १५ फूट या अंतरात त्याची लागवड करणे योग्य आहे. यापेक्षा कमी अंतरात लागवड केली तर आर्द्रता वाढणे, हवा खेळती न राहणे, अशा समस्या निर्माण होतात आणि रोगराई वाढते. तेल्या रोग, अशा बागांमध्ये फोफावू शकतो, असे मतही सुपे यांनी व्यक्त केले.

सेंद्रीय मल्चींगमध्ये गव्हाचे कूट नको
बागेत सेंद्रीय मल्चींग (आच्छादन) करणे योग्य असते. पण गव्हाचे कूट टाकणे योग्य नाही. काड्या, पाला, पाचोळा, सोयाबीनच्या काढणीनंतर येणारा भुसा, गवत आदींचा वापर करता येईल. सेंद्रीय मल्चींग अतिशय लाभदायी असते, असेही सुपे यांनी सांगितले.
छाटणीची गरज नाही
पूर्वीच्या काळात डाळिंबाच्या बागांमध्ये छाटणीची गरज नसायची, पण अलीकडे छाटणीशिवाय बागच घेतली जात नाही. २५ रुपये प्रतिझाड, अशी मजुरी त्यासाठी वाया घालविली जाते. अशास्त्रीय पद्धतीने छाटणी केली जाते. शिवाय छाटणीनंतर लागलीच पाणी दिले जाते. पण त्यानंतर बागेला १० दिवस पाणी द्यायला नको. हलकी छाटणी करायला हवी, असेही सुपे म्हणाले.
फड पद्धतीने पाणी देऊ नये
डाळिंब बागेला फड पद्धतीने पाणी देऊ नये. ड्रीप वापरावे. तसेच खते व पाणी देण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून घ्यावे, असे सुपे यांनी सांगितले.