शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सांप्रदायिक हिंसेच्या घटना वाढल्या, पण मृत्यूंचे प्रमाण घटले- गृह मंत्रालय

By admin | Updated: November 24, 2015 11:26 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटना वाढल्या असल्या तरी मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अहवालात समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशात सध्या बराच वाद सुरू असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सांप्रदायिक हिंसेत कमी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत ८६ लोकांचा मृत्यू झाला असून गेल्या वर्षी (२०१४) हे प्रमाण ९० इतके होते. 
सांप्रदायिक हिंसेच्या घटनांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंसेच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सांप्रदायिक हिंसेच्या ६३० घटना घडल्या आहेत तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण  ५६१ इतके होते. तर २०१३ साली युपीए सरकारच्या कार्यकाळात तब्बल ६९४ घटना घडल्या होत्या, त्यामध्ये मुझफ्फरनगरच्या दंगलीचाही समावेश होता, ज्यात ६५ नागरिक मारले गेले होते. 
यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटनेत तब्बल १८९९ नागरिक जखमी झाले, गेल्या वर्षी जखमींची संख्या १,६८८ इतकी होती.
गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०१३ साली महाराष्ट्रातील धुळे व उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये ७० लोक मृत्यूमुखी पडले तर सुमार १०० नागरिक जखमी झाले होते. २०१४ साली एनडीएची सत्ता आल्यानंतर जुलै महिन्यात युपीतील सहारणपूरमध्ये झालेल्या घटनेत ३ जण मृत्यूमुखी पडले तर २३ लोक जखमी झाले. मात्र २०१५ मध्ये आत्तापर्यंत अशी कोणतीही मोठी घटना घडली नसल्याचे तरी अहवालात नमूद करण्यात आले आहे.