शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कर्नाटकमध्ये सव्वा वर्षांत १२०० शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, समोर आली धक्कादायक कारणं, या ३ जिल्ह्यांत सर्वाधिक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 20:58 IST

Karnataka Farmer News: मागच्या सव्वा वर्षाच्या काळात कर्नाटकमध्ये घडलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने खळबळ उडवली आहे. सरकारी कागदपत्रांमधील नोंदीनुसार मागच्या  १५  महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ११८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

मागच्या सव्वा वर्षाच्या काळात कर्नाटकमध्ये घडलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने खळबळ उडवली आहे. सरकारी कागदपत्रांमधील नोंदीनुसार मागच्या  १५  महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ११८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. भीषण दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि मोठ्या प्रमाणावरील कर्ज ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागची मुख्य कारणं असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.  

महसूल विभागाच्या कागदपत्रांनुसार कर्नाटकमधील बेळगाव, हावेरी आणि धारवाड या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे १२२, १२० आणि १०१ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. तर चिकमंगळूरमध्ये ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कलबुर्गी जिल्ह्यात ६९ आणि यादगिरी येथे याच काळात ६८ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. 

कर्नाटकमधील २७ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. यामधील केवळ सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे आकडे हे एकेरी संख्येमध्ये आहेत. उर्वरित २१ जिल्ह्यांमध्ये ३०च्यावर शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. चिकबल्लापूर आणि चामराजनगर या दोन जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. 

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमागे भीषण दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि मोठ्या प्रमाणावरील कर्जबाजारीपणा या कारणांचा समावेश आहे. तर बिगरशासकीय संघटना आणि संस्थांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये इतरही काही कारणं आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रKarnatakकर्नाटक